शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कतार विवाद : आम्हाला फक्त भारतीयांची चिंता - सुषमा स्वराज

By admin | Updated: June 5, 2017 22:48 IST

सौदी अरेबियासर आखाती देशातील राष्ट्रांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोतण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारताने आज आपली भूमिका

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सौदी अरेबियासर आखाती देशातील राष्ट्रांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोतण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारताने आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कतारवरून निर्माण झालेला विवाद हा आखाती देशांचा अंतर्गत प्रश्न असून, आम्हाला फक्त तेथे राहणाऱ्या भारतीयांचीच चिंता असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. 
 
कतारबाबत आखाती देशांनी घेतलेल्या निर्णयाचा या देशांशी असलेल्या भारताच्या संबंधांवर परिणाम होणार नसल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सुषमा स्वराज म्हणाल्या, "कतारबाबत इतर आखाती देशांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमच्यासमोर कोणत्याही प्रकारचे आव्हान निर्माण झालेले नाही. हा आखाती देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र आम्हाला तेथे राहत असलेल्या भारतीयांची चिंता आहे आणि तेथे कुणी भारतीय अडकलेला नाही ना याचा तपास आम्ही करत आहोत."  आखाती देशामध्ये अशा घटना याआधीही घडल्या आहेत आणि परिस्थिती लवकरच सुधरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 
 
दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली होती. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला. बहारिनने आज सकाळी कतारसोबत आपले संबंध तोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. दहशतवादाला समर्थन देण्याव्यतिरिक्त आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये कतार ढवळाढवळ करत असल्याचेही बहारिनने म्हटले होते.  
 
या चारही देशांनी कतासबोत फक्त राजकीय संबंधच नाही तर हवाई आणि समुद्री संपर्कही तोडण्याची घोषणा केली . बहारिनने कतारमध्ये राहत असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत येण्यासाठी 14 दिवसांची वेळ दिला आहे. सौदी अरेबियाने आपल्या निर्णयाची माहिती देताना दहशतवाद आणि कट्टरपंथीयांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे.