शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कतार विवाद : आम्हाला फक्त भारतीयांची चिंता - सुषमा स्वराज

By admin | Updated: June 5, 2017 22:48 IST

सौदी अरेबियासर आखाती देशातील राष्ट्रांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोतण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारताने आज आपली भूमिका

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सौदी अरेबियासर आखाती देशातील राष्ट्रांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोतण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारताने आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कतारवरून निर्माण झालेला विवाद हा आखाती देशांचा अंतर्गत प्रश्न असून, आम्हाला फक्त तेथे राहणाऱ्या भारतीयांचीच चिंता असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. 
 
कतारबाबत आखाती देशांनी घेतलेल्या निर्णयाचा या देशांशी असलेल्या भारताच्या संबंधांवर परिणाम होणार नसल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सुषमा स्वराज म्हणाल्या, "कतारबाबत इतर आखाती देशांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमच्यासमोर कोणत्याही प्रकारचे आव्हान निर्माण झालेले नाही. हा आखाती देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र आम्हाला तेथे राहत असलेल्या भारतीयांची चिंता आहे आणि तेथे कुणी भारतीय अडकलेला नाही ना याचा तपास आम्ही करत आहोत."  आखाती देशामध्ये अशा घटना याआधीही घडल्या आहेत आणि परिस्थिती लवकरच सुधरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 
 
दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली होती. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला. बहारिनने आज सकाळी कतारसोबत आपले संबंध तोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. दहशतवादाला समर्थन देण्याव्यतिरिक्त आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये कतार ढवळाढवळ करत असल्याचेही बहारिनने म्हटले होते.  
 
या चारही देशांनी कतासबोत फक्त राजकीय संबंधच नाही तर हवाई आणि समुद्री संपर्कही तोडण्याची घोषणा केली . बहारिनने कतारमध्ये राहत असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत येण्यासाठी 14 दिवसांची वेळ दिला आहे. सौदी अरेबियाने आपल्या निर्णयाची माहिती देताना दहशतवाद आणि कट्टरपंथीयांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे.