शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

हिंसाचाराला पायबंद घाला!

By admin | Updated: May 4, 2017 03:28 IST

वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली

नवी दिल्ली : ओडिशामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्तारूढ बिजदकडून राजकीय विरोधकांविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. भाजपाच्या दुसऱ्या एका शिष्टमंडळाने याच हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागितली आहे.पेट्रोलियम न नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्ली येथे राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रधान म्हणाले, ‘ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील कालीकुंडा या गावात शेळीपालन करून आपली गुजराण करणाऱ्या पार्वती सासमल या गरीब महिलेने नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला मतदान केले म्हणून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पार्वतीने तिच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रोड शोदरम्यान निवेदनही सादर केले होते. पंतप्रधानांना निवेदन देऊन आपल्या कुटुंबीयांसमवेत परत येत असताना बिजदच्या गुंडांनी तिच्यावर पुन्हा भीषण हल्ला केला.’ओडिशातील सत्तारूढ बिजदतर्फे राजकीय विरोधकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. तेथील पंचायत निवडणुकीच्या आधी आणि नंतर अशा हिंसाचारात किमान १० जण मारले गेले आहेत. राज्यात अशा प्रकारचा राजकीय हिंसाचार याआधी कधीही पाहिलेला नाही, असे प्रधान म्हणाले.सत्तारूढ बिजदचा जनाधार वेगाने ढासळतो आहे आणि त्यामुळे बिजद हिंसक बनली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यात तत्काळ हस्तक्षेप करावा आणि बिजदच्या हिंसाचाराला बळी ठरलेल्या गरीब महिला व इतरांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती प्रधान यांनी केली. भाजपाच्या या शिष्टमंडळात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संदीप पात्रा, ओडिशाचे भाजपा सरचिटणीस पृथ्वीराज हरिचंदन, प्रदेश सचिव डॉ. लेखाश्री सामंतसिंघर यांचा समावेश होता.