शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सैनिकांना हृदयात स्थान द्या

By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST

संभाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्मान

संभाजी पाटील यांचे आवाहन : वीरपत्नी भावना गोस्वामी यांचा सन्मान
नागपूर : सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत देश व देशवासीयांचे संरक्षण करीत असतात. त्यांची केवळ संकटकाळात आठवण करू नका. त्यांना हृदयात स्थान द्या असे आवाहन २२ मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे सेवानिवृत्त कमांडिंग ऑफिसर कर्नल संभाजी पाटील यांनी केले.
मरणोपरांत अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित ९ पॅरा कमान्डो बटालियनचे लान्स नाईक शहीद मोहननाथ गोस्वामी यांना प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे रविवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, त्यांच्या पत्नी भावना यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कर्नल पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त कर्नल सुनील देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
शहीद गोस्वामी यांचा पराक्रम कधीच विसरता येणार नाही. सैनिक केवळ देशाच्या रक्षणासाठी लढत असतो. सैनिकांप्रमाणे नागरिकांनीही देशसेवेचा विचार केला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी सर्व प्रकारचे भेदभाव विसरून चांगली व्यक्ती होणे आवश्यक आहे. केवळ ट्रकच्या मागे मेरा भारत महान लिहिल्याने काहीच होणार नाही. देशप्रेम मनात जागवले पाहिजे. शिस्त विकासाचा पाया आहे. शिस्त पाळणारा देशच विकास करू शकतो असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी युद्धाच्या आठवणीही सांगितल्या.
बलिदान जीवनाचे सत्य आहे. देशासाठी सर्वस्व समर्पित करणे आपली परंपरा आहे. अशी व्यक्ती पूज्यनिय असते असे तिवारी यांनी सांगितले. तसेच, त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर खंत व्यक्त केली. आज आपण विशिष्ट प्रसंगीच सैनिकांची आठवण काढतो. अभ्यासक्रमातून सैनिकांच्या पराक्रमाचे धडे काढून टाकण्यात आले आहेत. देशाचा संपूर्ण इतिहास शहिदांनी भरलेला आहे. परंतु, कोणालाही शहिदांची नावे माहिती नाहीत. देशाचा विकास तरुणांवर अवलंबून आहे. विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारा धर्म व जातीभेद तरुणांनी नष्ट करावा. तसे झाल्यास देशाच्या अखंडतेला काहीच धोका राहणार नाही असे ते म्हणाले.
----------------
भावना गोस्वामी भावुक झाल्या
सन्मानाला उत्तर देताना भावना गोस्वामी भावुक झाल्या होत्या. यामुळे कार्यक्रमात उपस्थित अनेकांचा कंठ दाटून आला. भावना यांनी पतीवर गर्व वाटत असल्याचे व त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे मनोगत व्यक्त केले. तसेच, पतीचा सन्मान केल्यामुळे आभार मानले.