शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

पुरी शंकराचार्यांचा बहिष्कार वाद उफाळला

By admin | Updated: July 5, 2014 05:21 IST

पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेवर बहिष्कार घातल्याच्या वादात शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्री आणि आसामच्या राज्यपालांनी उडी घेतल्यामुळे राजकीय कलाटणी मिळाली

भुवनेश्वर : पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेवर बहिष्कार घातल्याच्या वादात शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्री आणि आसामच्या राज्यपालांनी उडी घेतल्यामुळे राजकीय कलाटणी मिळाली आहे. पुरी रथयात्रेवर निर्बंध आणत राज्य सरकारने हस्तक्षेप करायला नको होता, असा सूर व्यक्त होऊ लागला आहे.पुरीचे शंकराचार्यांच्या हस्ते रथ ओढून रथयात्रेला प्रारंभ करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. यावेळी स्वामी निश्चलानंद यांनी राज्य सरकारने आणलेल्या बंधनामुळे २९ जून रोजी रथयात्रेत सहभागी होण्याचे टाळले. एवढ्या वर्षांची परंपरा मोडीत काढणे स्वीकारार्ह नाही, असे ओडिशाचे माजी राज्यपाल जे.बी. पटनाईक यांनी म्हटले. धर्मनिरपेक्ष देशात सरकारने कोणत्याही समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करायला नको, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरी येथे भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्यानंतर दिली. शंकराचार्यांना भेटणार काय, यावर त्यांनी वेळेअभावी सध्या ते शक्य होणार नाही. नंतर निश्चितच भेटणार असे उत्तर पत्रकारांना दिले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. रथयात्रेची परंपरा मोडित काढण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हायलाच हवी. राज्य सरकारने या वादात पडणे दुर्दैवी बाब आहे, असे केंद्रीय आदिवासी विकासमंत्री ज्युएल ओराम यांनी म्हटले.(वृत्तसंस्था)शंकराचार्यांना रथावर चढण्यास मज्जाव करणे खेदजनक आहे. त्यांना अटकाव घालणारे पत्र राज्य सरकारने पाठवले होते, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आसामचे राज्यपाल (ओडिशाचे माजी मुख्यमंत्री) जे.बी. पटनाईक यांनी दिली. (वृत्तसंस्था)