शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

पुरी शंकराचार्यांचा बहिष्कार वाद उफाळला

By admin | Updated: July 5, 2014 05:21 IST

पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेवर बहिष्कार घातल्याच्या वादात शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्री आणि आसामच्या राज्यपालांनी उडी घेतल्यामुळे राजकीय कलाटणी मिळाली

भुवनेश्वर : पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेवर बहिष्कार घातल्याच्या वादात शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्री आणि आसामच्या राज्यपालांनी उडी घेतल्यामुळे राजकीय कलाटणी मिळाली आहे. पुरी रथयात्रेवर निर्बंध आणत राज्य सरकारने हस्तक्षेप करायला नको होता, असा सूर व्यक्त होऊ लागला आहे.पुरीचे शंकराचार्यांच्या हस्ते रथ ओढून रथयात्रेला प्रारंभ करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. यावेळी स्वामी निश्चलानंद यांनी राज्य सरकारने आणलेल्या बंधनामुळे २९ जून रोजी रथयात्रेत सहभागी होण्याचे टाळले. एवढ्या वर्षांची परंपरा मोडीत काढणे स्वीकारार्ह नाही, असे ओडिशाचे माजी राज्यपाल जे.बी. पटनाईक यांनी म्हटले. धर्मनिरपेक्ष देशात सरकारने कोणत्याही समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करायला नको, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरी येथे भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्यानंतर दिली. शंकराचार्यांना भेटणार काय, यावर त्यांनी वेळेअभावी सध्या ते शक्य होणार नाही. नंतर निश्चितच भेटणार असे उत्तर पत्रकारांना दिले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. रथयात्रेची परंपरा मोडित काढण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हायलाच हवी. राज्य सरकारने या वादात पडणे दुर्दैवी बाब आहे, असे केंद्रीय आदिवासी विकासमंत्री ज्युएल ओराम यांनी म्हटले.(वृत्तसंस्था)शंकराचार्यांना रथावर चढण्यास मज्जाव करणे खेदजनक आहे. त्यांना अटकाव घालणारे पत्र राज्य सरकारने पाठवले होते, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आसामचे राज्यपाल (ओडिशाचे माजी मुख्यमंत्री) जे.बी. पटनाईक यांनी दिली. (वृत्तसंस्था)