शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

सामान्याचा सोशल लढा, एनडीटीव्हीला मागायला लावली माफी

By admin | Updated: November 1, 2016 13:45 IST

सोशल मिडियाचा वापर करुन एका सामान्य व्यक्तीने प्रतिष्ठीत चॅनेल एनडीटीव्हीला माफी मागायला भाग पाडले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - एखाद्या न्यूज चॅनेलवर चुकीची बातमी दाखवण्यात येत असेल तर तुम्ही काय करता? अनेकदा मित्रांशी, सोशल मीडियावर चर्चा केली जाते, त्याबद्दल एखादं ट्विट किंवा पोस्ट टाकली जाते. त्यानंतर वाद-विवाद होतात आणि तो मुद्दा थोड्या दिवसांनी विसरुन जातो. सोशल मिडिया फक्त एक करमणुकीचं साधन नसून आपण त्याचा योग्य वापर करत लढाही देऊ शकतो. अशाच प्रकारे सोशल मिडियाचा वापर करुन एका सामान्य व्यक्तीने प्रतिष्ठीत चॅनेल एनडीटीव्हीला माफी मागायला भाग पाडले आहे. 
 
चैतन्य जोशी असं या व्यक्तीचं नाव असून ट्विटरला त्यांचे फक्त 200 फॉलोअर्स आहेत. जून 2016 रोजी चैतन्य जोशी एनडीटीव्ही चॅनेलवरील 'राईज अॅण्ड फॉल ऑफ नेशन्स' कार्यक्रम पाहत होते. 'एनडीटीव्हीवरील राजकीय बातम्या एकतर्फी असल्याने मी त्या पाहणे टाळतो. डॉ प्रणॉय रॉय आणि रुचीर शर्मा या कार्यक्रमात सहभागी असल्याने मी हा कार्यक्रम पाहत होतो. त्यावेळी मला काहीतरी विचित्र पाहायला मिळाले', असं चैतन्य जोशी यांनी सांगितलं. 
 
'मी अत्यंत लक्ष देऊन आणि बारकाईने कार्यक्रम पाहत होतो. त्यांनी स्क्रीनवर भारताचा नकाशा दाखवला आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अक्साई चीन हा भाग चीनमध्ये दाखवण्यात आला तर पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं त्यांनी नकाशात दाखवलं होतं. एक भारतीय चॅनेलच देशाचा अपमान करत होतं. ही चूक डॉ प्रणॉय रॉय यांच्यादेखील लक्षात आली नाही, आणि तोच नकाशा वारंवार त्याच चुकांसहित दाखवण्यात आला. त्यानंतर मी कॅमेरा काढून फोटो काढण्यास सुरुवात केली', असं चैतन्य जोशी यांनी सांगितलं.
 
चैतन्य जोशींनी यानंतर ही चूक लक्षात आणून देण्यासाठी बरखा दत्त, प्रणॉय रॉय या सर्वांना ट्विट केलं. मात्र कोणीच काही उत्तर दिलं नाही. पण ते इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीकडे (CPGRAMS) तक्रार केली आणि पुरावे म्हणून फोटोदेखील पाठवले. तसंच पोलीस तक्रारही केली. 
 
काहीच होत नसल्याने सर्व आशा संपल्या होत्या असं चैतन्य यांना वाटत होतं. मात्र एक दिवस अचानक त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रायल तसंच न्यूज स्टँडर्ड ब्रॉडकास्टिंग अथॉरिटीकडून एक पत्र आलं ज्यामध्ये एनडीटीव्हीला त्यांच्या चुकीसाठी माफी मागण्यात सांगण्यात आलं होतं. 
एनटीव्हीला 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या प्राईट टाईम शोमध्ये चूक झाल्याचं मान्य करत माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे. 
 
'आपण प्रत्येकजण हे करु शकतो. मी हातात बंदूक घेऊन सीमारेषेवर लढायला जाऊ शकत नाही, पण पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट पाहणार नाही तसंच चीनी मालाची खरेदी करायची नाही असं ठरवू शकतो. तिरंग्याचा किंवा नकाश्याचा अपमान मी सहन करणार नाही' अशा भावना चैतन्य जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत. फक्त सोशल मीडियाच्या आधारे एका सामान्य व्यक्तीने दिलेला लढा आणि त्यातून मिळालेला विजय हे नक्कीच इतरांसाठी उदाहरण आहे.