शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सामान्याचा सोशल लढा, एनडीटीव्हीला मागायला लावली माफी

By admin | Updated: November 1, 2016 13:45 IST

सोशल मिडियाचा वापर करुन एका सामान्य व्यक्तीने प्रतिष्ठीत चॅनेल एनडीटीव्हीला माफी मागायला भाग पाडले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - एखाद्या न्यूज चॅनेलवर चुकीची बातमी दाखवण्यात येत असेल तर तुम्ही काय करता? अनेकदा मित्रांशी, सोशल मीडियावर चर्चा केली जाते, त्याबद्दल एखादं ट्विट किंवा पोस्ट टाकली जाते. त्यानंतर वाद-विवाद होतात आणि तो मुद्दा थोड्या दिवसांनी विसरुन जातो. सोशल मिडिया फक्त एक करमणुकीचं साधन नसून आपण त्याचा योग्य वापर करत लढाही देऊ शकतो. अशाच प्रकारे सोशल मिडियाचा वापर करुन एका सामान्य व्यक्तीने प्रतिष्ठीत चॅनेल एनडीटीव्हीला माफी मागायला भाग पाडले आहे. 
 
चैतन्य जोशी असं या व्यक्तीचं नाव असून ट्विटरला त्यांचे फक्त 200 फॉलोअर्स आहेत. जून 2016 रोजी चैतन्य जोशी एनडीटीव्ही चॅनेलवरील 'राईज अॅण्ड फॉल ऑफ नेशन्स' कार्यक्रम पाहत होते. 'एनडीटीव्हीवरील राजकीय बातम्या एकतर्फी असल्याने मी त्या पाहणे टाळतो. डॉ प्रणॉय रॉय आणि रुचीर शर्मा या कार्यक्रमात सहभागी असल्याने मी हा कार्यक्रम पाहत होतो. त्यावेळी मला काहीतरी विचित्र पाहायला मिळाले', असं चैतन्य जोशी यांनी सांगितलं. 
 
'मी अत्यंत लक्ष देऊन आणि बारकाईने कार्यक्रम पाहत होतो. त्यांनी स्क्रीनवर भारताचा नकाशा दाखवला आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अक्साई चीन हा भाग चीनमध्ये दाखवण्यात आला तर पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं त्यांनी नकाशात दाखवलं होतं. एक भारतीय चॅनेलच देशाचा अपमान करत होतं. ही चूक डॉ प्रणॉय रॉय यांच्यादेखील लक्षात आली नाही, आणि तोच नकाशा वारंवार त्याच चुकांसहित दाखवण्यात आला. त्यानंतर मी कॅमेरा काढून फोटो काढण्यास सुरुवात केली', असं चैतन्य जोशी यांनी सांगितलं.
 
चैतन्य जोशींनी यानंतर ही चूक लक्षात आणून देण्यासाठी बरखा दत्त, प्रणॉय रॉय या सर्वांना ट्विट केलं. मात्र कोणीच काही उत्तर दिलं नाही. पण ते इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीकडे (CPGRAMS) तक्रार केली आणि पुरावे म्हणून फोटोदेखील पाठवले. तसंच पोलीस तक्रारही केली. 
 
काहीच होत नसल्याने सर्व आशा संपल्या होत्या असं चैतन्य यांना वाटत होतं. मात्र एक दिवस अचानक त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रायल तसंच न्यूज स्टँडर्ड ब्रॉडकास्टिंग अथॉरिटीकडून एक पत्र आलं ज्यामध्ये एनडीटीव्हीला त्यांच्या चुकीसाठी माफी मागण्यात सांगण्यात आलं होतं. 
एनटीव्हीला 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या प्राईट टाईम शोमध्ये चूक झाल्याचं मान्य करत माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे. 
 
'आपण प्रत्येकजण हे करु शकतो. मी हातात बंदूक घेऊन सीमारेषेवर लढायला जाऊ शकत नाही, पण पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट पाहणार नाही तसंच चीनी मालाची खरेदी करायची नाही असं ठरवू शकतो. तिरंग्याचा किंवा नकाश्याचा अपमान मी सहन करणार नाही' अशा भावना चैतन्य जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत. फक्त सोशल मीडियाच्या आधारे एका सामान्य व्यक्तीने दिलेला लढा आणि त्यातून मिळालेला विजय हे नक्कीच इतरांसाठी उदाहरण आहे.