शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

जनमानस

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कार्निव्हल हवाच का?

कार्निव्हल हवाच का?
कार्निव्हल सारखे गोव्याच्या संस्कृतीशी सूतरामही संबंध नसलेले कार्यक्रम पर्यटनाच्या नावाखाली सरकारने राबवू नयेत अशी मागणी ऐरणीावर आलेली आहे. कार्निव्हलचा ख्रिस्ती धमार्शी वा त्यातील परंपरांशी काहीच संबंध नाही असेही चर्च संस्थेने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या वाचकांच्या मानसाचा घेतलेला हा धांदोळा

काय लाभ?
कार्निव्हलद्वारे आपल्याला काय साध्य करायचे आहे तेच मला कळत नाही. पांच शहरात या उत्सवाचे आयोजन करताना सरकारने किमान एक कोटी रुपये उधळले असतील. त्यांची भरपाई करायला कुठले पर्यटक येथे येणार आहेत? आधीच आपला पर्यटन हंगाम तोट्यात गेल्याची चर्चा आहे. असा परिस्थितीत अनाठायी खर्च करणे योग्य नव्हे.
संजय दाभोळकर, कळंगूट

इंत्रूज साजरे करुया
कार्निव्हल हा ब्राझीलमध्ये जसा चालतो तसा गोव्यात करणे आपल्याला शक्य नाही. अंगप्रत्यंगांचे हिडीस दर्शन घडवत मुलींना नाचवणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. सरकारने अशा प्रकारच्या उत्सवाच्या आयोजनात पडू नये. त्याने काहीही साध्य होणार नाही. पैसे मात्र वाया जातील. त्यापेक्षा इंत्रूज साजरे करावे, परंपरेला कल्पकतेची जोड द्यावी.
सुषमा फळारी, म्हापसा

पर्यटनास पोषक
कार्निव्हल आपला उत्सव नाही हे मान्य. पण गोवेकरांच्या दृष्टीने विचार केल्यास नवरात्रीत गर्बा खेळणे वा दांडिया खेळणे हे तरी आपले उत्सव कुठे आहेत? तरिही आपली तरुणाई दांडिया खेळतेच ना? भिबत्सपणा वा शरीरप्रदर्शन या विषयांवरून कार्निव्हलला विरोध होणे मी समजू शकतो. आता तसे होत नाही. मग पर्यटनाला पोषक असलेले असे मनोरंजनाचे उत्सव आयोजित करण्यास हरकत कशाला?
ेॅसुदेश तेंडुलकर, फोंडा.

ही तर दिवाळखोरी.
केवळ पर्यटन हवे म्हणून आपण काहीह करायचे कां? भारतीय लोककलांचा महाउत्सव आपण आयोजित करू शकत नाही का? तो केल्यास पर्यटक येणार नाही असा का आपला समज आहे? आपल्या पर्यटनाची दिशा चुकते आहे आणि याची कारणे शासकांच्या बौद्धिक दिवाळखोरीत सामावलेली आहेत.
सुरज कोलवाळकर, उसगाव