शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पं.स.सभापतींच्या पतीला घरात घुसून मारहाण

By admin | Updated: June 12, 2016 22:34 IST

जळगाव: गावातील अतिसाराची लागण व त्यातून झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूस जबाबदार धरुन संतप्त गावकर्‍यांनी आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी रात्री दहा वाजता जळगाव पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे व पुतण्या किरण गोपाळ मोरे यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरुध्द ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका जणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जळगाव: गावातील अतिसाराची लागण व त्यातून झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूस जबाबदार धरुन संतप्त गावकर्‍यांनी आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी रात्री दहा वाजता जळगाव पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे व पुतण्या किरण गोपाळ मोरे यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरुध्द ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका जणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला होता. या वादात पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. त्याच वेळी गावकर्‍यांनी सरपंच वत्सलाबाई मोरे व पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे यांना अतिसाराबाबत जाब विचारत या घटनेला सरपंच व सभापतीच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्या घरावर हल्ला चढविला. दरम्यान, डंपरचा हा वाद हा निमित्त ठरला. डंपर जळगावचा असला तरी प्रत्यक्षात त्याचा चालक गावातीलच होता व हा डंपरही रिकामाच होता, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दुचाकी व रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
रात्री पोलिसांकडून धरपकड
या घटनेत दिलीप रामा पाटील, दीपक जानकीराम पाटील, भूषण हिलाल पाटील, भूषण धर्मा पाटील, ज्ञानेश्वर पंढरीनाथ पाटील, लहू नामदेव पाटील, बापू नामदेव पाटील, पंढरीनाथ नामदेव पाटील व नारायण नामदेव पाटील (सर्व रा.आव्हाणे) यांच्याविरुध्द दंगल व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर संशयितांची धरपकड करुन भुषण धर्मा पाटील वगळता सर्व आठ जणांना अटक केली. भूषण हा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
गावात तणावपूर्ण शांतता
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, उपनिरीक्षक वंदना सोनुने, गुन्हे शोध पथकाचे राजेंद्र बोरसे, जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, प्रफुल्ल धांडे यांनी घटनास्थळ गाठले. वातावरण जास्तच चिघडल्याने पाहून निरीक्षक पाटील यांनी मुख्यालयातील आरसीपीचे एक प्लाटून मागवून घेतले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. आता गावात तणावपूर्ण शांतता आहे, मात्र बंदोबस्त कायम आहे.