शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दुबार पेरणीसाठी अनुदान द्यावे, ठराव संमत

By admin | Updated: July 10, 2015 00:28 IST

स्थायी समिती सभा : कृत्रिम पावसाचाही प्रस्ताव

स्थायी समिती सभा : कृत्रिम पावसाचाही प्रस्तावनाशिक : जिल्‘ात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या हंगामात दुबार पेरणीचे संकट कायम असून, शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी आवश्यक ते बियाणे खरेदीसाठी शासनाने तत्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.स्थायी समितीची बैठक रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीत सदस्य प्रवीण जाधव यांनी जिल्‘ातील पावसाची टक्केवारी व दुबार पेरण्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. गोरख बोडके यांनी सभापती केदा अहेर शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप केला. त्यावर कृषी विभागाने जिल्‘ात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केल्याचे केदा अहेर यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी जिल्‘ात सरासरीच्या १५ टक्के पाऊस झाल्याची तसेच ३४ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्याचे सांगितले. पावसाची आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप प्रवीण जाधव यांनी केला. तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास काय नियोजन केले आहे, याची विचारणा केली. त्यावर जिल्‘ात खरिपासाठी ७२ हजार बियाण्यांचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. पैकी ४९ हजार ८९१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा, तर ३३ हजार ८९३ बियाण्यांची विक्री झाली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास जिल्‘ात ३३ हजार ९६८ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता असल्याचे बोराडे यांनी सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी जिल्‘ात बियाण्यांची अवाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून, त्याबाबत कृषी विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, असे सांगितले. शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्‘ात दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असून, आता शेतकर्‍यांना दुबार पेरण्यांसाठी पैसा नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी बियाण्यांच्या खरेदीसाठी तत्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावे, असा ठराव त्यांनी मांडला तो सर्वानुमते संमत करण्यात आला. बैठकीस सदस्य गोरख बोडके, प्रा. अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, प्रवीण जाधव आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)इन्फो..ग्रामपंचायतींना ई-टेंडरिंग नाहीचतीन लाखांच्या पुढील कामांना ई-टेंडरिंग निर्णय लागू असताना ग्रामपंचायतींना मात्र त्यांच्या अंतर्गत रस्त्यांची कामे व जनसुविधेच्या कामांसाठी १० व १५ लाखांपर्यंतची मर्यादा असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी दिली. तसेच यापुढे ५० लाखांच्या पुढील कोणत्याही खरेदीसाठी ई-टेंडरिंग राबविण्याचा नवीन शासन निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.