शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

देशाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार

By admin | Updated: June 8, 2015 02:44 IST

२०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.

मुंबई : ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टीने यंदाचे वर्ष कमालीचे यशस्वी ठरले असून २०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखती दरम्यान गोयल बोलत होते. २०२० सालापर्यंत देशातील वीज उत्पादनात ५० टक्के वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीन विविध आघाड्यांवर काम सुरु आहे. यंदा कोळसा उत्पादनात ८.३ टक्के तर वीज उत्पादनात ८.४ टक्के वाढ झाल्याचा सांगत या क्षेत्रातील चढता आलेख गोयल यांनी यावेळी मांडला. वीज तोटा ३.६ टक्क्यांवर आणतानाच उत्पादन क्षमता २२ हजार ५६६ मेगावॅटने तर वीज वितरणाचे जाळे २२ हजार १०० सर्किट किलोमीटरने वाढविण्यात आली आहे. वीज उत्पादनाने पहिल्यांदाच १ लाख कोटी युनिटचा आकडा पार केला आहे. वीज वितरण कंपन्यांमध्ये १.०९ लाख कोटींची गुंतवणूक व्हावी म्हणून नव्या योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील कोळसा खाणी कर्नाटकला देण्यात आल्याच्या आरोपाबाबत बोलताना गोयल म्हणाले की, देशात केवळ सहा राज्यात कोळशाचे उत्पादन होते. प्रत्येक राज्यातील विजेचा प्रश्न सोडवायचे असेल तर कोळशासारख्या राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपात समन्वय साधणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आधीच दोन महत्वाच्या आणि जास्त क्षमतेच्या खाणी आहेत. शिवाय अन्य राज्यातूनही कोळसा पुरविला जातो. त्यामुळे प्रांतिक भूमिका घेणे चुकीचे असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. येत्या पाचवर्षात कोल इंडियाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करण्यात येणार असून, ते प्रतिवर्ष १०० कोटी टन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर, पर्यावरण पूरक ऊर्जानिर्मितीसाठी सौरऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे. २०१४-१५ या सालात देशातील सौरऊर्जेच्या क्षमतेत ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १४ राज्यांतील १७ सौरप्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे देशांतर्गत सौरऊर्जेची क्षमता तीसपट वाढविण्याचे लक्ष्य आहे, असे गोयल म्हणाले. एलईडी बल्बच्या माध्यमातून किमान दहा टक्के वीज वाचविता येणार आहे. त्यासाठी येत्या तीन वर्षात देशभर एलईडी दिवे बसविणार. २०१६ पर्यंत ९० लाख एलईडी बल्बद्वारे रस्ते प्रकाशमान करणार. पारदर्शक खरेदी प्रक्रीयेमुळे ३१० रुपयांच्या एलईडी बल्बची किंमत ८२ रुपयांपर्यंत खाली आणली. १८ राज्यांतील १५१ शहरांत घरेलू कुशलता प्रकाश कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे गोयल म्हणाले.