शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

देशाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार

By admin | Updated: June 8, 2015 02:44 IST

२०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.

मुंबई : ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टीने यंदाचे वर्ष कमालीचे यशस्वी ठरले असून २०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखती दरम्यान गोयल बोलत होते. २०२० सालापर्यंत देशातील वीज उत्पादनात ५० टक्के वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीन विविध आघाड्यांवर काम सुरु आहे. यंदा कोळसा उत्पादनात ८.३ टक्के तर वीज उत्पादनात ८.४ टक्के वाढ झाल्याचा सांगत या क्षेत्रातील चढता आलेख गोयल यांनी यावेळी मांडला. वीज तोटा ३.६ टक्क्यांवर आणतानाच उत्पादन क्षमता २२ हजार ५६६ मेगावॅटने तर वीज वितरणाचे जाळे २२ हजार १०० सर्किट किलोमीटरने वाढविण्यात आली आहे. वीज उत्पादनाने पहिल्यांदाच १ लाख कोटी युनिटचा आकडा पार केला आहे. वीज वितरण कंपन्यांमध्ये १.०९ लाख कोटींची गुंतवणूक व्हावी म्हणून नव्या योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील कोळसा खाणी कर्नाटकला देण्यात आल्याच्या आरोपाबाबत बोलताना गोयल म्हणाले की, देशात केवळ सहा राज्यात कोळशाचे उत्पादन होते. प्रत्येक राज्यातील विजेचा प्रश्न सोडवायचे असेल तर कोळशासारख्या राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपात समन्वय साधणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आधीच दोन महत्वाच्या आणि जास्त क्षमतेच्या खाणी आहेत. शिवाय अन्य राज्यातूनही कोळसा पुरविला जातो. त्यामुळे प्रांतिक भूमिका घेणे चुकीचे असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. येत्या पाचवर्षात कोल इंडियाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करण्यात येणार असून, ते प्रतिवर्ष १०० कोटी टन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर, पर्यावरण पूरक ऊर्जानिर्मितीसाठी सौरऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे. २०१४-१५ या सालात देशातील सौरऊर्जेच्या क्षमतेत ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १४ राज्यांतील १७ सौरप्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे देशांतर्गत सौरऊर्जेची क्षमता तीसपट वाढविण्याचे लक्ष्य आहे, असे गोयल म्हणाले. एलईडी बल्बच्या माध्यमातून किमान दहा टक्के वीज वाचविता येणार आहे. त्यासाठी येत्या तीन वर्षात देशभर एलईडी दिवे बसविणार. २०१६ पर्यंत ९० लाख एलईडी बल्बद्वारे रस्ते प्रकाशमान करणार. पारदर्शक खरेदी प्रक्रीयेमुळे ३१० रुपयांच्या एलईडी बल्बची किंमत ८२ रुपयांपर्यंत खाली आणली. १८ राज्यांतील १५१ शहरांत घरेलू कुशलता प्रकाश कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे गोयल म्हणाले.