शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बजरंग बोगद्यानजीक दोन भूमिगत मार्ग ंमहापालिकेचा प्रस्ताव: रेल्वे प्रशासनाची मान्यता, पावणेचार कोटी भरावे लागणार

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.

जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.
महापौर नितीन लढढा, आयुक्त जीवन सोनवणे व मनपातील इतर पदाधिकार्‍यांनी सोमवारी बजरंग बोगदा परिसरात भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली.
लाखो लोकांच्या रहदारीचा खडतर मार्ग
बजरंग बोगदा हा वाहतुकीसाठी नाही मात्र शहराकडे येण्यासाठी जवळचा व सुरक्षित म्हणून त्याचा वापर केला जात असतो. पिंप्राळा रेल्वे गेट या ठिकाणचा मार्ग पिंप्राळा, खोटेनगर, निमखेडी, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भिकमचंद जैन नगर या भागातील नागरिक वाहतुकीसाठी वापरत असतात. या व्यतिरिक्त बजरंग सांडपाण्याचा बोगदा या परिसरातील लोखा नागरिक सोयीचा मार्ग म्हणून वापरतात. त्याखालून दुचाकी वाहनांची प्रचंड ये-जा सुरू असते. रिक्षा, मोठ्या वाहनांना येण्या जाण्यासाठी पिंप्राळा रेल्वे गेट हाच पर्याय आहे.
दरमहा लाखो वाहनांची ये-जा
एका पाहणीच्या अहवालानुसार पिंप्राळा रेल्वे गेटवरून वाहतूक होणार्‍या वाहनांची संख्या एक ते सव्वा लाख दरमहा आहे. हे रेल्वे गेट रेल्वे स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे हे गेट बर्‍याच वेळेस बंदच असते. नजीकच रेल्वे गुड्स यार्ड आहे. या यार्डवर शेकडो ट्रक दिवसभरात येत जात असतात. गेट बंद असल्यास या भागात वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे दृश्य नेहमी पहायला मिळते. रेल्वे गेटपासून रेल्वेस समांतर रोड हा गणेश कॉलनी भागाकडे जातो याच रोडवर बजरंग सांडपाण्याचा बोगदा आहे. रेल्वे गेट बंद असल्यास लहान, लहान दुचाकी चालक वळतात ते बजरंग बोगद्याकडे. या बोगद्याची निर्मिती ही सांडपाणी वाहून जाण्यासाठी रेल्वेने केली होती मात्र आता वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने त्याचा वापर वाहतुकीसाठी होतो.