शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ईपीएफओतील प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रस्ताव रद्द

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) असलेल्या कामगार संघटना आणि उद्योगांच्या प्रतिनिधित्वात कपात करण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) असलेल्या कामगार संघटना आणि उद्योगांच्या प्रतिनिधित्वात कपात करण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यामुळे ईपीएफओतील प्रतिनिधित्व कमी करण्याचा हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते. ईपीएफओतील कामगार संघटना आणि उद्योगांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा हा प्रस्ताव जनतेचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत होता.
कर्मचारी भविष्य निधी आणि संकीर्ण तरतूद कायदा १९५२ मध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सरकार, कर्मचारी आणि नियोक्त्यांच्या त्रिपक्षीय बैठकीत श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ईपीएफओतील कर्मचारी किंवा नियोक्त्यांच्या प्रतिनिधित्वात कपात न करण्याची कामगार संघटनांची मागणी मान्य केली. ईएफओच्या केंद्रीय मंडळावर कामगार संघटना आणि उद्योगांचे प्रत्येक दहा प्रतिनिधी नियुक्त करण्यात येतात. त्यात कपात करून ही संख्या पाचवर आणण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. परंतु त्याला कामगार संघटनांनी जोरदार विरोध केला होता. (वृत्तसंस्था)