शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याच्या देशवापसीसाठी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव

By admin | Updated: February 10, 2017 08:53 IST

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याची देशवापसी करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याची देशवापसी करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. 
(कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा)
 
भारतात खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पणाची मागणी
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी गुरुवारी सांगितले की, माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. तसंच यावेळी ब्रिटिश सरकारकडून माल्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटिश सरकारचे आधीचे रेकॉर्ड पाहता, या प्रयत्नात तरी यश येईल की नाही? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.  
(माल्याच्या पत्रांवरून भाजपाने मनमोहन, चिदंबरम यांना घेरले)
 
विजय माल्यावरुन वारंवार केंद्र सरकारला धारेवर धरणा-या विरोधकांनाही 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खडेबोलदेखील सुनावले आहेत. 'एनडीए सरकारने आपल्या कार्यकाळात माल्याला एकाही पैशांचा फायदा होऊ दिला नाही. तत्कालीन युपीए सरकारच्या कार्यकाळात माल्याला कर्ज मिळाले आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला जास्त अवधीही देण्यात आला. युपीए सरकारच्या कर्माची शिक्षा आम्ही भोगत आहोत'. अशा शब्दांत जेटली यांनी युपीए सरकारवर हल्लाबोल केला.