शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विजय माल्याच्या देशवापसीसाठी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव

By admin | Updated: February 10, 2017 08:53 IST

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याची देशवापसी करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याची देशवापसी करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. 
(कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा)
 
भारतात खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पणाची मागणी
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी गुरुवारी सांगितले की, माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. तसंच यावेळी ब्रिटिश सरकारकडून माल्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटिश सरकारचे आधीचे रेकॉर्ड पाहता, या प्रयत्नात तरी यश येईल की नाही? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.  
(माल्याच्या पत्रांवरून भाजपाने मनमोहन, चिदंबरम यांना घेरले)
 
विजय माल्यावरुन वारंवार केंद्र सरकारला धारेवर धरणा-या विरोधकांनाही 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खडेबोलदेखील सुनावले आहेत. 'एनडीए सरकारने आपल्या कार्यकाळात माल्याला एकाही पैशांचा फायदा होऊ दिला नाही. तत्कालीन युपीए सरकारच्या कार्यकाळात माल्याला कर्ज मिळाले आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला जास्त अवधीही देण्यात आला. युपीए सरकारच्या कर्माची शिक्षा आम्ही भोगत आहोत'. अशा शब्दांत जेटली यांनी युपीए सरकारवर हल्लाबोल केला.