शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

मोदी सरकारचे घोडेबाजाराला प्रोत्साहन

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नितीशकुमार यांचा आरोप

नितीशकुमार यांचा आरोप
नवी दिल्ली : बिहार राज्य विधानसभेत आपल्याला स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. मोदी सरकार राज्यपालांशी संगनमत करून बिहारमधील आमदारांच्या घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहे, असा स्पष्ट आरोप संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केला आहे.
बहुतांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा असणे स्वाभाविक आहे. बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे निर्णय घेण्यात विलंब लावत असल्याने नव्या सरकारच्या स्थापनतही अडचणी येत आहेत, असे नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार हे मंगळवारी सायंकाळी आपल्या १३० समर्थक आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी या १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर हजर केले. ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात विलंब लावला जात आहे, त्यावरून मोदी सरकारच्या वतीने आमदार फोडण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हेतू स्पष्ट आहे. त्यांना बहुमताचे सरकार स्थापन होऊ द्यायचे नाही. यामुळे घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळेल, असे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
यासंदर्भात तत्काळ कृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून नितीशकुमार पुढे म्हणाले, जेवढा उशीर होईल तेवढे राजकीय वातावरण खराब होत जाईल. राज्यात जे काही घडते आहे ते सर्व लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. (वृत्तसंस्था)