शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

मोदी सरकारचे घोडेबाजाराला प्रोत्साहन

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नितीशकुमार यांचा आरोप

नितीशकुमार यांचा आरोप
नवी दिल्ली : बिहार राज्य विधानसभेत आपल्याला स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. मोदी सरकार राज्यपालांशी संगनमत करून बिहारमधील आमदारांच्या घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहे, असा स्पष्ट आरोप संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केला आहे.
बहुतांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा असणे स्वाभाविक आहे. बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे निर्णय घेण्यात विलंब लावत असल्याने नव्या सरकारच्या स्थापनतही अडचणी येत आहेत, असे नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार हे मंगळवारी सायंकाळी आपल्या १३० समर्थक आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी या १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर हजर केले. ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात विलंब लावला जात आहे, त्यावरून मोदी सरकारच्या वतीने आमदार फोडण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हेतू स्पष्ट आहे. त्यांना बहुमताचे सरकार स्थापन होऊ द्यायचे नाही. यामुळे घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळेल, असे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
यासंदर्भात तत्काळ कृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून नितीशकुमार पुढे म्हणाले, जेवढा उशीर होईल तेवढे राजकीय वातावरण खराब होत जाईल. राज्यात जे काही घडते आहे ते सर्व लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. (वृत्तसंस्था)