शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वंकष आराखड्यातून विद्यापीठाच्या विकासाला गती

By admin | Updated: January 19, 2017 01:59 IST

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठातून नवीन ज्ञानप्राप्ती

सुधींद्र कुलकर्णी यांचा आशावाद : गोंडवाना विद्यापीठात भविष्यातील दिशा व आराखड्यावर विचारमंथन गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठातून नवीन ज्ञानप्राप्ती होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. याकरिता सर्वंकष आराखडा आवश्यक आहे. राज्य शासनाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाकडे सर्वंकष आराखडा सादर करणार, या आराखड्यातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडेल, असा आशावाद आॅबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशन मुंबईचे चेअरमन सुधिंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ‘गोंडवाना विद्यापीठाची भविष्याची दिशा, आराखडा व रूपरेषा संदर्भात शैक्षणिक समुदायास आवाहन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख मार्गर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून गिरीश प्रभूणे, प्रा. राजेश राकडे, विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सुधिंद्र कुलकर्णी म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचा विकास आराखडा बनवून तो राज्यपाल व महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे काम आॅबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशनला मिळाले आहे. फाऊंडेशनने आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत रिसर्च करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व विकासासाठी विशिष्ट आराखडा शासनाला सादर केला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याला गती आली. आयटीआयबाबतही सर्वेक्षण करण्यात आले असून यासंदर्भातील अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे, इच्छाशक्ती व दृष्टी ठेवली तर गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ जगातील श्रेष्ठ विद्यापीठाच्या यादीत नक्कीच समाविष्ट होईल, असे ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी चांगले कॅम्पस्, इमारत, भौतिक सुविधांची गरज आहे. तसेच विविध प्रकारचे कोर्सेस शाखा, तसेच विद्यार्थीही असणे महत्त्वाचे आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीत परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. याकरिता गोंडवाना विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय चालविणारे संस्थापक, प्राचार्य, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेते, या सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. सर्वंकष आराखड्यातून सर्वांच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठाचे नवीन भविष्य घडवू या, असे आवाहन कुलकर्णी यांनी यावेळी केले. याप्रसंगी गिरीश प्रभूणे म्हणाले, पूर्वीच्या काळात भारतात तक्षशीला, नालंदा अशी अनेक जागतिक स्तरावर ओळख निर्माण झालेली विद्यापीठे स्वयंपूर्ण होती. पूर्वीच्या काळात शिक्षण ही कुणाचीही मक्तेदारी नव्हती. भारतात व महाराष्ट्रात ज्ञान व औद्योगिक समृद्धी होती. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधन संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आता गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती व रोजगार निर्मिती घडविण्याची गरज आहे, असे प्रभूणे यावेळी म्हणाले. कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले, गोंडवाना विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी स्थानिकस्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावर स्पर्धेत टिकले पाहिजे, त्यांनी मोठमोठ्या नोकऱ्या मिळविल्या पाहिजेत, यासाठी ज्ञानदानाची केंद्र विस्तारित होणे गरजेचे आहे. या विद्यापीठातून शिकलेले विद्यार्थी सर्वांगिणदृष्ट्या सक्षम आवश्यक आहे. तेव्हाच गोंडवाना विद्यापीठाचे खरी फलीत साध्य होईल, असेही डॉ. कल्याणकर यांनी यावेळी सांगितले. संचालन विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रोकडे यांनी केले. या चर्चासत्राला विद्यापीठाचे कुलसचिव दीपक जुनघरे, व्यवस्थापन समितीचे सदस्य समीर केने, नीलेश बने, भटाचार्य यांच्यासह विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)