शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘टीम इंडिया’ बनून समस्या सोडवा

By admin | Updated: May 11, 2015 03:25 IST

केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

बर्नपूर (प. बंगाल) : केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.येथील आयआयएससीओच्या आधुनिक पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुसऱ्या देशांसोबतचे मुद्दे ‘टीम इंडिया’च्या भावनेने सोडवले जात असतील तर अंतर्गत मुद्द्यांचे समाधान या माध्यमातून अगदी सहज काढले जाऊ शकते. संसदेने भारत-बांगलादेश भूसीमेशी संबंधित समझोत्याबाबतचे विधेयक सर्वसहमतीने पारित केले. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसह पश्चिम बंगाल, आसाम, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी केंद्रासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. यापुढेही टीम इंडियाच्या भावनेने काम केल्यास राष्ट्रीय समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातील, असे मोदी या वेळी म्हणाले. मी अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलो. त्यामुळेच राज्यांविषयी केंद्राची भूमिका काय असायला हवी, हे मी जाणतो. आपल्या राज्यघटनेने संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारली आहे. (वृत्तसंस्था)भारताचा आर्थिक विकास जगात सर्वांत वेगवानदेशात नवे सरकार स्थापन होऊन केवळ एक वर्ष झाले. पण वर्षभरात भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. एक वर्षापूर्वी भारत डुबला. आता तो कधीही वर येऊ शकणार नाही, असे जग समजत होते. पण रालोआ सरकारने गतवर्षभरात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी पायाभरणी केली, असा दावाही मोदींनी या वेळी केला.