शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

उत्तर प्रदेशात रंगणार प्रियंका गांधी-स्मृती इराणी यांचे राजकीय द्वंद्व

By admin | Updated: March 7, 2016 03:05 IST

उत्तर प्रदेशात मे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस महायुद्ध छेडले जाणार असताना अचानक प्रियंका गांधी- वढेरा यांचे नाव समोर आले आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीउत्तर प्रदेशात मे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस महायुद्ध छेडले जाणार असताना अचानक प्रियंका गांधी- वढेरा यांचे नाव समोर आले आहे. या राज्यात भाजपकडून मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी आणि प्रियंका यांच्यातील द्वंद्व रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे प्रशांत किशोर हे प्रियकांच्या भाषणाला आक्रमकतेची धार चढवतील, असे समजते.सध्या हे दोन पक्ष आसामच्या निवडणुकीसाठी जोर लावत आहेत. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या तरूण गोगोई यांची सत्ता उलथविण्यासाठी भाजपने आगप आणि बोडो पीपल्स फ्रंट (बीपीएफ) यांची मदत घेतली आहे; मात्र खरी लढाई दिसेल ती उत्तर प्रदेशात.उत्तर प्रदेशात मुलायम, मायावती आणि मोदी हे ‘थ्री एम’ फॅक्टर प्रबळ राहिले असले तरी आता ते चित्र मागे पडेल असे दिसते. दिल्ली आणि बिहारच्या पराभवानंतर मोदींचा कमी झालेला प्रभाव विधानसभा निवडणुकीत त्यांचे महत्त्व कमी करणारा ठरेल. दोन्ही पक्षांची रणनीती पाहता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुख्य प्रचारक म्हणून प्रियंका गांधी यांना समोर आणू शकते. काँग्रेसने गेल्या २५ वर्षांत प्रादेशिक नेता देण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न अपयशी ठरला. आता काँग्रेस आणि मित्र पक्षांनी प्रचाराची सूत्रे प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविण्याचा सल्ला दिला आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांच्यासोबत दोन बैठकी पार पाडत समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अजितसिंग यांच्या नेतृत्वातील रालोद, अपना दल, शांतता पक्ष, डावे पक्ष आणि अन्य फुटीर गट एकाच छत्राखाली आल्यास दलित आणि मुस्लिमांच्या एका गटाची मते समाजवादी पक्ष आणि बसपाकडून हिसकावून घेतली जाऊ शकतात, हे सूत्र ठेवून आघाडी स्थापण्याची कल्पना समोर आली.भाजपकडे पर्यायी चेहरा नाही...भाजपकडे या राज्यात सर्वमान्य असा चेहरा नाही. खा. वरुण गांधी यांच्याकडे कौशल्य असूनही ती जबाबदारी सोपविता येत नाही. पराभवाचा धसका असल्यामुळे राजनाथसिंग मान अडकवायला तयार नाहीत. त्यामुळेच इराणी यांना मुख्य प्रचारकर्त्याच्या रुपात समोर आणले जाईल असे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. जेएनयूमधील वादाच्या पार्श्वभूमीवर इराणी यांची संसदेतील आक्रमक भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक टिष्ट्वटर हँडलवर टाकले होते. त्यामुळे तर्कवितर्कांत भरच पडली. गेल्या लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांच्याशी दोन हात करताना दाखविलेली भाषणातील आक्रमकता त्यांना पक्षात वरच्या पंक्तीत स्थान देणारी ठरली.