शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

प्रियांकांचा प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:21 IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली. या दारुण पराभवाला त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किती जबाबदार आहेत याविषयी आता चर्चा रंगली आहे. प्रियांका गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झाक दिसते. प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केल्यास त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असे. मात्र त्या अनेक वर्षे राजकारणापासून दूरच होत्या. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या काळात काही प्रकरणांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. गांधी परिवाराला मोदी सरकार कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण झाले.‘उत्तर प्रदेश पूर्व’ची जबाबदारीयंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या सरटिणीसपदी नेमले व त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली. त्या भागात नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह ४० लोकसभा मतदारसंघ येतात. या परिसरात प्रियांका गांधी यांनी घणाघाती प्रचार केला. त्यासाठी गंगायात्राही काढली. मात्र निवडणूक निकालांतून असे दिसले की, प्रियांका गांधी यांचा मतदारांवर काहीही प्रभाव पडला नाही.प्रियांका या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अमेठी, रायबरेली मतदारसंघांना भेटी देत असत. त्यांच्या निवडणूक प्रचारातही सहभागी होत. मात्र त्या वेळी सक्रिय राजकारणात नसल्याने झाकली मूठ सव्वा लाखाची होती.

अपयशामुळे प्रियांका गांधींच्या करिष्म्याबद्दल आता विरोधी सूर लागण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला विजय मिळावा म्हणून त्या राज्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची कामगिरी प्रियांका गांधींवर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची फारशी जबाबदारी त्यांच्यावर नाही. त्यामुळे प्रियांका गांधींवर खूपच टीका होऊ लागली तर हे उद्गार त्यांच्या मदतीस येऊ शकतात. परंतु निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींचा काहीही प्रभाव पडला नाही हे सत्य लपणार नाही.