शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रियांकांचा प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:21 IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली. या दारुण पराभवाला त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किती जबाबदार आहेत याविषयी आता चर्चा रंगली आहे. प्रियांका गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झाक दिसते. प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केल्यास त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असे. मात्र त्या अनेक वर्षे राजकारणापासून दूरच होत्या. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या काळात काही प्रकरणांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. गांधी परिवाराला मोदी सरकार कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण झाले.‘उत्तर प्रदेश पूर्व’ची जबाबदारीयंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या सरटिणीसपदी नेमले व त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली. त्या भागात नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह ४० लोकसभा मतदारसंघ येतात. या परिसरात प्रियांका गांधी यांनी घणाघाती प्रचार केला. त्यासाठी गंगायात्राही काढली. मात्र निवडणूक निकालांतून असे दिसले की, प्रियांका गांधी यांचा मतदारांवर काहीही प्रभाव पडला नाही.प्रियांका या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अमेठी, रायबरेली मतदारसंघांना भेटी देत असत. त्यांच्या निवडणूक प्रचारातही सहभागी होत. मात्र त्या वेळी सक्रिय राजकारणात नसल्याने झाकली मूठ सव्वा लाखाची होती.

अपयशामुळे प्रियांका गांधींच्या करिष्म्याबद्दल आता विरोधी सूर लागण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला विजय मिळावा म्हणून त्या राज्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची कामगिरी प्रियांका गांधींवर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची फारशी जबाबदारी त्यांच्यावर नाही. त्यामुळे प्रियांका गांधींवर खूपच टीका होऊ लागली तर हे उद्गार त्यांच्या मदतीस येऊ शकतात. परंतु निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींचा काहीही प्रभाव पडला नाही हे सत्य लपणार नाही.