शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

प्रियांकांचा प्रभाव नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:21 IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली. या दारुण पराभवाला त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किती जबाबदार आहेत याविषयी आता चर्चा रंगली आहे. प्रियांका गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झाक दिसते. प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केल्यास त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असे. मात्र त्या अनेक वर्षे राजकारणापासून दूरच होत्या. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या काळात काही प्रकरणांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. गांधी परिवाराला मोदी सरकार कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण झाले.‘उत्तर प्रदेश पूर्व’ची जबाबदारीयंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या सरटिणीसपदी नेमले व त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली. त्या भागात नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह ४० लोकसभा मतदारसंघ येतात. या परिसरात प्रियांका गांधी यांनी घणाघाती प्रचार केला. त्यासाठी गंगायात्राही काढली. मात्र निवडणूक निकालांतून असे दिसले की, प्रियांका गांधी यांचा मतदारांवर काहीही प्रभाव पडला नाही.प्रियांका या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अमेठी, रायबरेली मतदारसंघांना भेटी देत असत. त्यांच्या निवडणूक प्रचारातही सहभागी होत. मात्र त्या वेळी सक्रिय राजकारणात नसल्याने झाकली मूठ सव्वा लाखाची होती.

अपयशामुळे प्रियांका गांधींच्या करिष्म्याबद्दल आता विरोधी सूर लागण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला विजय मिळावा म्हणून त्या राज्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची कामगिरी प्रियांका गांधींवर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची फारशी जबाबदारी त्यांच्यावर नाही. त्यामुळे प्रियांका गांधींवर खूपच टीका होऊ लागली तर हे उद्गार त्यांच्या मदतीस येऊ शकतात. परंतु निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींचा काहीही प्रभाव पडला नाही हे सत्य लपणार नाही.