ऑनलाइन टीम
अलाहाबाद, दि. १८ - काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अलाहाबाद येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींना पक्षात आणा अशी मागणी करणारे फलक सर्वत्र लावले आहे. राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पन्नाशीही ओलांडता न आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सर्वच राज्यांमध्ये राज्यस्तरीय व केंद्रीय नेतृत्वाविषयी कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची वाताहत झाल्यावर अलाहाबादमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधीकडे काँग्रेसची धूरा सोपवावी असे फलकच शहरात लावले आहे. 'प्रियंका बढाये काँग्रेला का कद,उत्तरप्रदेश मे अग्निपथ अग्निपथ अग्निपथ' असा संदेश या फलकावर लिहीण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा प्रियंका गांधींना सक्रीय राजकारणात आणण्यासाठी दबाव वाढत आहे.