शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मंदीमुळे आर्थिक उत्पन्न शून्यावर, तरीही मौन बाळगून आहेत पंतप्रधान - प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 12:12 IST

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत'

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निशाणा साधला आहे. तर प्रियंका गांधी यांनी देशातील आर्थिक मंदी आणि महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. 

प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या तीन वर्षांत महागाईने उच्चांग गाठला आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक लागणाऱ्या वस्तू घेताना सर्व सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. देशातील आर्थिक मंदीमुळे उत्पन्न शून्यावर आले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. 

याशिवाय, प्रियंका गांधी यांनी आणखी एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सामान्य लोकांच्या समस्यांपासून इतक्या लांब असलेले पंतप्रधान असतील, असे कदाचित भारताच्या इतिहासात घडले असेल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणाऱ्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ईशान्येकडील राज्यांत जोरदार विरोध होत आहे. यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक