शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

प्रधान सचिवाला लाचप्रकरणी अटक

By admin | Updated: September 18, 2015 02:39 IST

बंद केलेली खाण पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भ्रष्टाचाराची खाण खणण्याचा नोकरशाहीचा धक्कादायक उद्योग उजेडात आला आहे. लाच म्हणून दिलेली तब्बल चार कोटी २८

जयपूर : बंद केलेली खाण पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भ्रष्टाचाराची खाण खणण्याचा नोकरशाहीचा धक्कादायक उद्योग उजेडात आला आहे. लाच म्हणून दिलेली तब्बल चार कोटी २८ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आलेल्या या प्रकरणातून नोकरशाही किती वरपर्यंत पोखरली आहे, हेही अधोरेखित झाले आहे. राजस्थानचे प्रधान सचिव (खाण) अशोक सिंघवी यांना गुरुवारी पहाटे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) अटक केल्यानंतर या लाच प्रकरणाचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. १९८३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले सिंघवी हे उदयपूर येथील राजस्थान राज्य खाण आणि खनिज लिमिटेडचे चेअरमनदेखील आहेत. सिंघवी यांच्या विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना बुधवारी उदयपूर आणि रिलवाडा येथील लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री सिंघवी यांना आधी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती पहाटे त्यांना अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईपूर्वी सिंघवींच्या जयपूर येथील निवासस्थानाची झडती घेण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर एसीबी कार्यालयात नेऊन त्यांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या लाच प्रकरणातील ४.२८ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या रकमेपैकी २.५५ कोटी रुपये सिंघवी आणि इतरांना देण्यात आले होते.चित्तोडगड येथील आपली बंद करण्यात आलेली खाण पुन्हा सुरू करण्यासाठी या खाणीचा मालक शेरखान याने ही २.५५ कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा आरोप आहे. राजस्थानच्या खनन विभागाने शेरखानच्या एकूण सहा खाणींचे लीज रद्द केले होते. कुणी लाच मागितल्याची तक्रार शेरखानने केली नसली तरी आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केली, असे एसीबीचे महासंचालक नवदीप सिंग म्हणाले. खान याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याने ही २.५५ कोटीची लाच आपल्या चार्टर्ड अकाउंटन्टला दिली होती आणि त्याने ती खाण विभागाचा दलाल संजय सेठी याला दिली. नंतर सेठी याने रक्कम उदयपूरचे अतिरिक्त संचालक (खाण) पंकज गहलोत आणि प्रधान सचिव अशोक सिंघवी यांच्याकडे पोहोचती केली, असा आरोप आहे. गेहलोतसह खाण अभियंता पी.आर. अमेटा, सीए श्याम सिंग सिंघवी, संजय सेठी आणि राशीद खान यांना आधीच अटक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)