शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पंतप्रधानांचे मौन पराभवासाठी कारणीभूत - कमलनाथ

By admin | Updated: May 18, 2014 13:01 IST

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे खापर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मौनावर फोडले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १८ - पंतप्रधान मनमोहन सिंग हे संवाद साधण्यात अपयशी ठरल्याचा फटका यूपीए सरकारला बसला आहे. पंतप्रधानांचे मौनामुळे तर परिस्थिती आणखी खालावली अशा शब्दांत  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी पराभवाचे खापर पंतप्रधानांवर फोडले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांवर खापर फोडतानाच कमलनाथ यांनी राहुल गांधींना मात्र पराभवासाठी जबाबदार ठरवलेले नाही. 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पन्नाशीही गाठता आलेला नाही. काँग्रेसच्या या दारुण पराभवासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र पक्षाचे नेते व छिंदवाडा येथून निवडून आलेले कमलनाथ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत पराभवाचे खापर पंतप्रधानांवर फोडले आहे. 'पक्षाला आपल्या रणनितीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाचा राजकीय दृष्टीकोन हा मागासलेला असून पक्षात नव्याने प्राण फुंकण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. कमलनाथ यांनी पराभवासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पराभवाला जबाबदार ठरवले असले तरी सरकारी योजना मात्र योग्यच होत्या असे त्यांनी स्पष्ट केले. 
'राहुल गांधी यांच्याकडे शेवटच्या आठ महिन्यांमध्ये प्रचाराची धूरा देण्यात आली.  त्यांचा सरकारच्या प्रदर्शन आणि उपलब्धींशी संबंध येत नाही या दाव्यात तथ्य नाही' असे सांगत कमलनाथ यांनी राहुल गांधींची पाठराखण केली. पक्षाने ब्लॉकस्तरावर पुन्हा एकदा नव्याने बांधणी करण्याची गरजही कमलनाथ यांनी व्यक्त केली.