शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

By admin | Updated: May 5, 2017 01:31 IST

देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे

सुरेश भटेवरा /नवी दिल्लीदेशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे अर्धातास चाललेल्या या भेटीत पवारांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, सिंचनाच्या सोयी, शेतमालाच्या हमी भावात वाढ, शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज आदी उपाययोजनांचा आग्रह धरला. या महत्वपूर्ण भेटीत मोदींना उद्देशून पवार म्हणाले, देशातला शेतकरी वर्ग संकटात आहे. वर्षभरात जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ४२९१ शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातही परिस्थिती गंभीरच आहे. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीची उपाययोजना केली नाही तर हा प्रश्न स्फोटक बनेल. पवार पंतप्रधानांना म्हणाले, युपीए सरकार सत्तेवर असतांना देशातल्या शेतकऱ्यांचे ७0 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याखेरीज अन्य उपायांचीही अमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. उत्तरप्रदेशात भाजपने अलीकडेच शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली. साहजिकच देशभर संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला आता उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी हवी आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातल्या तूर खरेदीच्या समस्येकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. पवारांच्या साऱ्या सुचना शांतपणे ऐकल्यावर पंतप्रधान म्हणाले, केंद्र विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्र्रीत करीतच आहे. तथापि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पवारांनी स्वत: पुढाकार घेतल्यास सरकारला मदत होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी मार्गदर्शन करावे, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करायला केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी पवारांना दिले.ईडीच्या धाडींतील गैरप्रकारांची तक्रारमुंबई व महाराष्ट्रात सध्या सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) धाडसत्र सुरू आहे. करबुडव्यांवर धाडी घालण्याची कारवाई कायदेशीर असली तरी या धाडी दरम्यान धाकदपटशाचा मार्ग अवलंबून अधिकाऱ्यांतर्फे संबंधितांना लुबाडण्याच्या गंभीर घटना घडत असल्याचे कानावर येत आहे, अशी गंभीर तक्रार नोंदवीत पवार पंतप्रधानांना म्हणाले, सक्त वसुली संचलनालयातर्फे महाराष्ट्रात यापूर्वी असा अतिरेक कधी घडलेला नाही. त्यावर पंतप्रधान म्हणाले, अशाच काही तक्रारी माझ्याही कानावर आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित विभागातर्फे देण्यात आले आहेत.