शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

By admin | Updated: May 5, 2017 01:31 IST

देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे

सुरेश भटेवरा /नवी दिल्लीदेशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे अर्धातास चाललेल्या या भेटीत पवारांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, सिंचनाच्या सोयी, शेतमालाच्या हमी भावात वाढ, शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज आदी उपाययोजनांचा आग्रह धरला. या महत्वपूर्ण भेटीत मोदींना उद्देशून पवार म्हणाले, देशातला शेतकरी वर्ग संकटात आहे. वर्षभरात जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ४२९१ शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातही परिस्थिती गंभीरच आहे. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीची उपाययोजना केली नाही तर हा प्रश्न स्फोटक बनेल. पवार पंतप्रधानांना म्हणाले, युपीए सरकार सत्तेवर असतांना देशातल्या शेतकऱ्यांचे ७0 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याखेरीज अन्य उपायांचीही अमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. उत्तरप्रदेशात भाजपने अलीकडेच शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली. साहजिकच देशभर संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला आता उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी हवी आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातल्या तूर खरेदीच्या समस्येकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. पवारांच्या साऱ्या सुचना शांतपणे ऐकल्यावर पंतप्रधान म्हणाले, केंद्र विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्र्रीत करीतच आहे. तथापि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पवारांनी स्वत: पुढाकार घेतल्यास सरकारला मदत होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी मार्गदर्शन करावे, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करायला केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी पवारांना दिले.ईडीच्या धाडींतील गैरप्रकारांची तक्रारमुंबई व महाराष्ट्रात सध्या सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) धाडसत्र सुरू आहे. करबुडव्यांवर धाडी घालण्याची कारवाई कायदेशीर असली तरी या धाडी दरम्यान धाकदपटशाचा मार्ग अवलंबून अधिकाऱ्यांतर्फे संबंधितांना लुबाडण्याच्या गंभीर घटना घडत असल्याचे कानावर येत आहे, अशी गंभीर तक्रार नोंदवीत पवार पंतप्रधानांना म्हणाले, सक्त वसुली संचलनालयातर्फे महाराष्ट्रात यापूर्वी असा अतिरेक कधी घडलेला नाही. त्यावर पंतप्रधान म्हणाले, अशाच काही तक्रारी माझ्याही कानावर आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित विभागातर्फे देण्यात आले आहेत.