शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांवर धार्मिक भेदभावाचा आरोप

By admin | Updated: August 7, 2014 02:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात पूजा (रुद्राभिषेक) केल्यावरून लोकसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले.

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात पूजा (रुद्राभिषेक) केल्यावरून लोकसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले.  
पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान सोमवारी काठमांडूजवळील पशुपतीनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला होता. त्यांनी येथे एक धर्मशाळा उभारण्यासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणादेखील केली. तसेच 25क्क् किलो चंदन भेट दिले. 
तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांनी उचलेल्या पावलाबद्दल (पूजा) आम्ही प्रशंसा करतो, परंतु त्यांनी गेल्या आठवडय़ात ईदच्या शुभेच्छादेखील द्यायला हव्या होत्या. पंतप्रधानांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना विजयादशमीनिमित्त विजयादशमीच्या आणि ईदनिमित्त  ईदच्या शुभेच्छा द्यायला हव्यात. यात भेदभाव का बाळगला जातो, असे ते म्हणाले. 
त्यांच्या वक्तव्यावर गोंधळ घालत असलेल्या भाजपाच्या खासदारांना बंडोपाध्याय म्हणाले, पंतप्रधानांनी नेपाळच्या एका मंदिरात पूजा केली. आम्ही त्यांची प्रशंसा करतो. परंतु त्यांनी ईद मुबारकदेखील म्हणायला हवे होते. 
यावर उत्तर देताना संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू म्हणाले, आमचा सर्वधर्मसमभावावर विश्वास आहे. पंतप्रधानांनी ईदनिमित्त त्याच दिवशी राष्ट्राला विशेषत: मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. नायडू यांच्या म्हणण्यानुसार, ईदच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी ‘ईद-उल-फितर की बधाई हो. यह पवित्र दिन हमारे देश भर मे शांती, एकता और भाईचारे के बंधन को और मजबूत करे’ असे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले होते. मात्र, काँग्रेसचे या उत्तराने समाधान झाले नाही. पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या मुद्यांवर बोलण्याची परवानगी मागितली. अध्यक्षांनी त्यांना परवानगी न दिल्याने विरोधीपक्षाचे खासदार अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि गदोराळ करू लागले. त्यामुळे 12.3क् वाजेर्पयत कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर चौधरी यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. 
 
4रमझानच्या महिन्यात पंतप्रधानांनी इफ्तार पार्टी न दिल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील इफ्तार पार्टी दिली होती, असे ते म्हणाले. यावर अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी ही व्यक्तिगत बाब असल्याचे म्हटले आणि हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी नाकारली. यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कामकाज पुन्हा 
2 वाजेर्पयत तहकूब करण्यात आले.