शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पंतप्रधानांनी मौन सोडावे

By admin | Updated: October 6, 2015 03:43 IST

गोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीगोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे. सोबतच देशात सद्भावना कायम राखण्यासाठी पक्षातर्फे येत्या १० आॅक्टोबरला उपवास ठेवण्यात येणार आहे.पक्षाचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सोमवारी येथे उपवास कार्यक्रमाची घोषणा करताना सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच नेते यात सहभागी होतील. कुठलीही अडचण न आल्यास हे हत्याकांड घडले त्या दादरीतील बिसहडा गावात हे आयोजन करण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनुसरण करीत समाजात बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न पक्ष या माध्यमाने करणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. निवडणूक राजकारणासाठी हे सर्व घडत असून या मुद्यावर पंतप्रधानांचे मौन म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांची स्वीकृतीच समजायची काय, असा सवालही त्यांनी केला. सरकारची काय भूमिका?मोदी सरकारवर हल्लाबोल करताना प्रमोद तिवारी म्हणाले की, राज्यघटनेची शपथ घेणारे त्यांचे मंत्रीच चिथावणीखोर वक्तव्ये करून घटनेचा अवमान करीत आहेत. अशात या संवेदनशील मुद्यावर सरकारची काय भूमिका आहे, याचा खुलासा पंतप्रधानांनी करणे गरजेचे आहे.मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे महेश शर्मा आणि संजीव बलियान या मुद्यावर जे बोलत आहेत तेच मोदी सरकारचे विचार समजायचे काय?