शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी मौन सोडावे

By admin | Updated: October 6, 2015 03:43 IST

गोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीगोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे. सोबतच देशात सद्भावना कायम राखण्यासाठी पक्षातर्फे येत्या १० आॅक्टोबरला उपवास ठेवण्यात येणार आहे.पक्षाचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सोमवारी येथे उपवास कार्यक्रमाची घोषणा करताना सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच नेते यात सहभागी होतील. कुठलीही अडचण न आल्यास हे हत्याकांड घडले त्या दादरीतील बिसहडा गावात हे आयोजन करण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनुसरण करीत समाजात बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न पक्ष या माध्यमाने करणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. निवडणूक राजकारणासाठी हे सर्व घडत असून या मुद्यावर पंतप्रधानांचे मौन म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांची स्वीकृतीच समजायची काय, असा सवालही त्यांनी केला. सरकारची काय भूमिका?मोदी सरकारवर हल्लाबोल करताना प्रमोद तिवारी म्हणाले की, राज्यघटनेची शपथ घेणारे त्यांचे मंत्रीच चिथावणीखोर वक्तव्ये करून घटनेचा अवमान करीत आहेत. अशात या संवेदनशील मुद्यावर सरकारची काय भूमिका आहे, याचा खुलासा पंतप्रधानांनी करणे गरजेचे आहे.मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे महेश शर्मा आणि संजीव बलियान या मुद्यावर जे बोलत आहेत तेच मोदी सरकारचे विचार समजायचे काय?