शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहिणार खास तरुण पिढीसाठी पुस्तक

By admin | Updated: July 4, 2017 01:28 IST

देशातील तरुण पिढीला डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक पुस्तक लिहिणार असून त्यात ते परीक्षेच्या वेळी येणारा ताण कसा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक पुस्तक लिहिणार असून त्यात ते परीक्षेच्या वेळी येणारा ताण कसा हाताळावा, प्रतिकूल परिस्थितीतही मानसिक संतुलन कसे राखावे आणि परीक्षेनंतरच्या भावी आयुष्याकडे डोळसपणे कसे पाहावे यासारख्या अनेक जिव्हाळ्याच्या विषयांवर देशाच्या भावी पिढीशी संवाद साधणार आहेत.कोणाही पंतप्रधानांनी पदावर असताना असे पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याने हा एकप्रकारे अभिनव उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना ज्यात रस वाटेल अशा अनेक विषयांवर मोदी या पुस्तकातून आपली मते मांडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे टप्पे ठरणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा हा या विचारमंथनाचा प्रमुख केंद्रबिंदू असेल.पेंग्विन रॅण्डम हाऊस (पीआरएच) ही प्रतिथयश प्रकाशन संस्था मोदींचे हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. एकाच वेळी अनेक भाषांमधील हे पुस्तक या वर्षीच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल, असे प्रकाशकांचे म्हणणे आहे. नफा कमावणे हा उद्देश नसलेले ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचे या पुस्तकासाठी तांत्रिक व माहितीआधारित सहकार्य मिळणार आहे. प्रकाशन संस्थेच्या म्हणण्यानुसार मोदी वडिलकीच्या नव्हे तर मित्रत्वाच्या नात्याने युवा पिढीशी संवाद साधणार असून परीक्षेत उत्तम यश मिळविणे गरजचे असले तरी ते सर्वस्व नाही. घोकंपट्टीने केवळ गुण मिळविण्याहून ज्ञानसंपन्न होणे अधिक महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करणार आहेत.प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचे पुस्तक  काढण्याची कल्पना स्वत: मोदी यांचीच आहे. ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून पुस्तकाचा विचार त्यांच्या मनात आला. ‘मन की बात’मधील विषयांची बीजे घेऊन आणि त्याला काही अनुभवांची व रोचक किश्श्यांची जोड देऊन पंतप्रधान आपले विचार या पुस्तकाच्या रूपाने मांडणार आहेत.

युवा पिढीने घडविलेल्या व नेतृत्व हाती घेतलेल्या भावी काळाचे स्वप्न माझ्या मनात आहे. त्यामुळेच या पुस्तकातून मी त्यांच्याशी मला अत्यंत प्रिय अशा विषयांवर हितगूज करणार आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानदेशाच्या तरुण पिढीला संदेश देणारे पंतप्रधान मोदी यांचे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आम्हाला खूप आनंद आहे. युवा पिढीच्या माध्यमातून देशात परिवर्तन घडवून आणण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे व ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे, ही आमच्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे.- गौरव श्रीनागेश, सीईओ, पीआरएच