शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी लवकरच करणार मंत्रिमंडळात फेरबदल

By admin | Updated: March 16, 2017 08:43 IST

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत. अनेक महत्वाची पदं रिक्त करण्यासाठी तसंच त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी देण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या संरक्षण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
 
मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधीच अर्थ मंत्रालय सांभाळणा-या अरुण जेटलींवर कामाचं ओझं त्यामुळे वाढलं आहे. त्यांच्यावरील हा भार कमी करण्याच्या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दुस-याकडे सोपवण्याची शक्यता आहे. 
 
2014 मध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुरुवातीला अरुण जेटलींवर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर मनोहर पर्रीकरांना गोव्याहून केंद्रात बोलावून संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. एकीकडे अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालय सांभाळायचं आहे, दुसरीकडे त्यांना संरक्षण मंत्र्याच्या नात्याने या विभागासाठी निधीची मागणीही करायची असल्याने त्यांची परिस्थिती अवघडल्यासाठी झाली आहे. 
 
सुषमा स्वराज यांच्यावर झालेल्या किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमुळे त्यांच्याकडील परराष्ट्र मंत्रालय काढून दुस-याला देण्यात येणार असल्याचीही चर्चा केली जात आहे. पण दुसरीकडे बुधवारी तीन महिन्यांनी लोकसभेत परतलेल्या सुषमा स्वराज एकदम फिट होत्या. त्यांनी लोकसभेत 15 मिनिटं भाषण केलं, आणि विशेष म्हणजे भाषण संपेपर्तय त्या उभ्या होत्या. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेरबदल करत असताना काही नवे चेहरे जोडले जाण्याची शक्यता आहे. काही राज्यमंत्रींना प्रमोशन दिलं जाऊ शकतं. मोदी सरकार एकीकडे आपलं तिसरं वर्ष पुर्ण करत असून नवीन चेहरे आणून महत्वाची मंत्रालयं मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. 
 
मोदी सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रउद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं, आणि त्यांच्या जाही प्रकाश जावडेकरांना आणण्यात आलं. वैंकय्या नायडू यांना जेटलींच्या जागी सूचना आणि प्रसारण मंत्रालय सोपवण्यात आलं. पत्रकारितेतून राजकारणात आलेले एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्य मंत्री बनवण्यात आलं.