शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पंतप्रधान मोदी लवकरच करणार मंत्रिमंडळात फेरबदल

By admin | Updated: March 16, 2017 08:43 IST

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत. अनेक महत्वाची पदं रिक्त करण्यासाठी तसंच त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी देण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या संरक्षण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
 
मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधीच अर्थ मंत्रालय सांभाळणा-या अरुण जेटलींवर कामाचं ओझं त्यामुळे वाढलं आहे. त्यांच्यावरील हा भार कमी करण्याच्या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दुस-याकडे सोपवण्याची शक्यता आहे. 
 
2014 मध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुरुवातीला अरुण जेटलींवर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर मनोहर पर्रीकरांना गोव्याहून केंद्रात बोलावून संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. एकीकडे अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालय सांभाळायचं आहे, दुसरीकडे त्यांना संरक्षण मंत्र्याच्या नात्याने या विभागासाठी निधीची मागणीही करायची असल्याने त्यांची परिस्थिती अवघडल्यासाठी झाली आहे. 
 
सुषमा स्वराज यांच्यावर झालेल्या किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमुळे त्यांच्याकडील परराष्ट्र मंत्रालय काढून दुस-याला देण्यात येणार असल्याचीही चर्चा केली जात आहे. पण दुसरीकडे बुधवारी तीन महिन्यांनी लोकसभेत परतलेल्या सुषमा स्वराज एकदम फिट होत्या. त्यांनी लोकसभेत 15 मिनिटं भाषण केलं, आणि विशेष म्हणजे भाषण संपेपर्तय त्या उभ्या होत्या. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेरबदल करत असताना काही नवे चेहरे जोडले जाण्याची शक्यता आहे. काही राज्यमंत्रींना प्रमोशन दिलं जाऊ शकतं. मोदी सरकार एकीकडे आपलं तिसरं वर्ष पुर्ण करत असून नवीन चेहरे आणून महत्वाची मंत्रालयं मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. 
 
मोदी सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रउद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं, आणि त्यांच्या जाही प्रकाश जावडेकरांना आणण्यात आलं. वैंकय्या नायडू यांना जेटलींच्या जागी सूचना आणि प्रसारण मंत्रालय सोपवण्यात आलं. पत्रकारितेतून राजकारणात आलेले एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्य मंत्री बनवण्यात आलं.