शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

पंतप्रधान मोदी लवकरच करणार मंत्रिमंडळात फेरबदल

By admin | Updated: March 16, 2017 08:43 IST

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत. अनेक महत्वाची पदं रिक्त करण्यासाठी तसंच त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी देण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या संरक्षण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
 
मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधीच अर्थ मंत्रालय सांभाळणा-या अरुण जेटलींवर कामाचं ओझं त्यामुळे वाढलं आहे. त्यांच्यावरील हा भार कमी करण्याच्या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दुस-याकडे सोपवण्याची शक्यता आहे. 
 
2014 मध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुरुवातीला अरुण जेटलींवर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर मनोहर पर्रीकरांना गोव्याहून केंद्रात बोलावून संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. एकीकडे अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालय सांभाळायचं आहे, दुसरीकडे त्यांना संरक्षण मंत्र्याच्या नात्याने या विभागासाठी निधीची मागणीही करायची असल्याने त्यांची परिस्थिती अवघडल्यासाठी झाली आहे. 
 
सुषमा स्वराज यांच्यावर झालेल्या किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमुळे त्यांच्याकडील परराष्ट्र मंत्रालय काढून दुस-याला देण्यात येणार असल्याचीही चर्चा केली जात आहे. पण दुसरीकडे बुधवारी तीन महिन्यांनी लोकसभेत परतलेल्या सुषमा स्वराज एकदम फिट होत्या. त्यांनी लोकसभेत 15 मिनिटं भाषण केलं, आणि विशेष म्हणजे भाषण संपेपर्तय त्या उभ्या होत्या. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेरबदल करत असताना काही नवे चेहरे जोडले जाण्याची शक्यता आहे. काही राज्यमंत्रींना प्रमोशन दिलं जाऊ शकतं. मोदी सरकार एकीकडे आपलं तिसरं वर्ष पुर्ण करत असून नवीन चेहरे आणून महत्वाची मंत्रालयं मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. 
 
मोदी सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रउद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं, आणि त्यांच्या जाही प्रकाश जावडेकरांना आणण्यात आलं. वैंकय्या नायडू यांना जेटलींच्या जागी सूचना आणि प्रसारण मंत्रालय सोपवण्यात आलं. पत्रकारितेतून राजकारणात आलेले एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्य मंत्री बनवण्यात आलं.