शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वस्त विमान सेवा ‘उडान’चा शुभारंभ

By admin | Updated: April 28, 2017 02:00 IST

दिल्ली- सिमला एवढ्या अंतराच्या उडान या स्वस्त हवाई सफरीचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचबरोबर

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीदिल्ली- सिमला एवढ्या अंतराच्या उडान या स्वस्त हवाई सफरीचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचबरोबर नांदेड- हैदराबाद व कडप्पा- हैदराबाद मार्गावरील उडानच्या पहिल्या उड्डाणांनाही व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रादेशिक हवाई संपर्क योजनेद्वारे भारतात सामान्य माणसाचे स्वस्त हवाई सफरीचे स्वप्न पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. दिल्ली- सिमला उड्डाणामुळे हिमाचल प्रदेशच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. यापुढे पायात हवाई चप्पल घालणाऱ्या प्रवाशांनादेखील देशाच्या विविध भागांत हवाई सफरीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी केले. सप्टेंबर २0१७ पर्यंत प्रादेशिक हवाई संपर्क योजनेद्वारे देशातल्या ४५ विमानतळांवर टप्प्याटप्प्याने स्वस्त प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर कोल्हापूर, जळगाव विमानतळांवर सप्टेंबर २0१७ मधे छोट्या विमानांद्वारे या योजनेचा प्रारंभ होईल. याखेरीज मुंबई-पोरबंदर, मुंबर्ई-कांडला हवाई वाहतूकदेखील याच सुमारास सुरू होणार आहे. केंद्र सरकारने १५ जून २0१६ रोजी राष्ट्रीय नागरी उड्डाण धोरण (एनसीएपी) जाहीर केले. या धोरणानुसार खाजगी विमान कंपन्यांना फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट विमानांद्वारे ५00 किलोमीटर्सची १ तासाची हवाई सफर अथवा हेलिकॉप्टरद्वारे अर्ध्या तासाच्या हवाई प्रवासासाठी फक्त २,५00 रुपये आकारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या धोरणानुसार देशातील ४५ विमानतळे ज्यांचा सध्या कमीत कमी अथवा नगण्य वापर आहे, त्यांचा प्रादेशिक हवाई संपर्क योजनेच्या व्यापक आराखड्यात समावेश करण्यात आला.केवळ २,५00 रुपयांच्या रकमेत खाजगी हवाई वाहतूक कंपन्या ही सेवा प्रदान करणार आहेत. या विमान कंपन्यांवर छोट्या अंतराच्या विमानसेवेखेरीज किमान ५ व अधिकतम १३ हेलिकॉप्टर्सची उड्डाणसेवा सुरू करण्याचेही बंधन आहे. छोट्या अंतरांचा हवाई प्रवास स्वस्त दरात घडवणारी ही जगातील पहिलीच योजना आहे.४५ विमानतळांचे भाग्य उजळणार-या योजनेमुळे देशातील ज्या ४५ विमानतळांचे भाग्य उजळणार आहे, त्यात उत्तर भारतातील सिमला, पठाणकोट, जालंदर, कुलू, लुधियाना, भटिंडा, डेहराडून, पंतनगर, जसैलमेर, जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर, लखनौ, गोरखपूर, कानपूर, वाराणसी, पश्चिम व मध्य भारतात पोरबंदर, द्वारका, मुद्रा, कांडला, जामनगर, भावनगर, दिव, सुरत, इंदूर, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, दक्षिण भारतातील चेन्नई व बंगळुरू या विद्यमान विमानतळांसह बीदर, विद्यानगर, म्हैसूर, विजयवाडा, विशाखापट्टणम, होसूर, सालेम, नेयवेली, पुड्डुचेरी, पूर्व भारतातील कोलकाता व भुवनेश्वर या विद्यमान विमानतळांसह अंबिकापूर, बिलासपूर, रायपूर, जगदलपूर, जैपोर, रायगड, उत्केला, रांची, बर्नपूर, दुर्गापूर, जमशेदपूर, रुरकेला, झारसुगडा, बागडोगरा, कुचबिहार तसेच ईशान्य भारतातील शिलाँग, दिमापूर, इम्फाळ, सिल्चर, अगरताळा व ऐझवाल या विमानतळांचा समावेश आहे.प्रस्तुत योजनेनुसार सध्या हवाई सेवा सुरू असलेल्या प्रमुख विमानतळांशी पश्चिम भारतातील २४ उत्तर भारतातील १७, दक्षिण भारतातील ११, पूर्व भारतातील १२ तसेच ईशान्य भारतातील ६, अशा देशातील ४५ विमानतळांना परस्परांशी जोडण्याचा सरकारचा संकल्प आहे.