शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

राफेल विमानांची किंमत सांगा मोदीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:19 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली आणि जुनेच मुद्दे भाषणातून पुन्हा पुन्हा ऐकवू नका, असे सुनावले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली आणि जुनेच मुद्दे भाषणातून पुन्हा पुन्हा ऐकवू नका, असे सुनावले.मोदी लोकसभेत तब्बल दीड तास बोलत होते. पण संपूर्ण भाषणात त्यांनी राफेल विमाने भारताने केवढ्याला विकत घेतली, याचे उत्तर दिले नाही. देशातील शेतकºयांच्या स्थितीवर त्यांनी शब्द उच्चारला नाही आणि तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाबद्दलही ते काहीच बोलले नाही.काँग्रेसने देशाची फाळणी केली, या मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, आज देशात केवळ काँग्रेस व जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच लोकशाही टिकून आहे, हे लक्षात ठेवावे. पंतप्रधानांनी वाटल्यास इतिहास बारकाईने वाचावा. राफेल विमानांची किंमत विचारताच संरक्षणमंत्री गुप्ततेचे कारण सांगतात, देशहिताचा विषय काढतात. राफेर विमानांच्या किंमती गुप्त ठेवण्याचे कारणच काय?।मल्लिकार्जुन खडगे यांचा हल्लाबोलकाँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खडगे यांनीही मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदी माझ्यावर सतत टीका करीत होते. लोकसभेत बसलेले सारे सदस्य कर्नाटकातील आहेत, असे समजून मोदी बोलत होेते. कर्नाटकात निवडणुका जिंकू पाहणारे मोदी व त्यांचा पक्ष राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळ्याबद्दल का बोलायला तयार नाहीत? या विमानांची किंमत तिप्पट कशामुळे झाली? जे कंत्राट सरकारी उपक्रमाला मिळणार होते, ते एका खासगी कंपनीला, विशिष्ट उद्योगपतीला का देण्यात आले? या साºयांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यायला हवीत.।लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्या!मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर ज्या पद्धतीने टीका केली, त्यामुळे संतापलेले राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी भलतेच विषय काढून लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यावरून दूर हटवण्याचीसवयच आहे. आपण पंतप्रधान आहोत,हेही त्यांच्या लक्षात राहत नाही. सतत विरोधकांवर टीका करणे हे सरकारचे काम नसून, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, त्याबाबत ते गप्पच राहतात. जाहीर सभांमध्ये त्यांनी आमच्यावर अवश्य टीकाकरावी. पण संसदेची प्रतिष्ठा त्यांनी ठेवायला हवी.तिथे त्या पद्धतीने वागायला हवे.।सोनिया गांधी यांचीही टीकासोनिया गांधी यांनी मोदी यांच्या भाषणावर सडकून टीका केली. पंतप्रधानांच्या भाषणात एकही गोष्ट नवी नव्हती, एक ते दीड तास ते सतत जुन्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत होते. लोकांना त्यात रस नाही. तरुणांना रोजगार व भवितव्य याची चिंता आहे. पण त्याविषयी मोदी बोलायलाच तयार नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी