शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

जनसुराज्यला रोखण्यासाठी महाआघाडीची मोट

By admin | Updated: February 15, 2017 19:08 IST

सरदार चौगुले/ पोर्ले तर्फ ठाणे : प्रत्येक पावलास मन बदलते. तसेच प्रत्येक निवडणुकीत राजकीय पटावरील धोरणही बदलत असतात. सोयीच्या राजकीय घडामोडीत कुणाचं काय चाललंय? याकडे मतदारांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.जनसुराज्य पक्षाने राजकीय ताकद वाढविण्यासाठी भाजप पक्षाशी दोन हात केले आहेत. तर तालुक्यात महाआघाडीने समझोत्याचे राजकारण करीत जनसुराज्य पक्षाला रोखण्यासाठी मोट बांधली आहे. इतर निवडणुकीत एकमेकांना पाण्यात बघणार्‍या नेत्यांनी सोयीच्या राजकारणासाठी हात गुंफले आहेत. त्यामुळे राजकारणाच्या बदलत्या संक्रमणात व स्थानिक पातळीवर बदललेल्या संदर्भामुळे अनेक नेत्यांसह कार्यकर्ते व मतदारांची गोची झाल्याचे चित्र दिसत आहे.

भोगावती : भोगावती सहकारी साखर कारखान्याची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत. चौकशी अधिकारी म्हणून विशेष लेखापरीक्षक वर्ग एकचे के. बी. तेलंग यांची नियुक्ती केली असून, या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
भोगावती साखर कारखान्यात सन २०१०/२०११/२०१२/२०१३ च्या अहवालात गंभीर दोष दाखविले आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून अपहार केला आहे. त्याची चौकशी करून नुकसानीची जबाबदारी संचालक मंडळावर निश्चित करावी अशी मागणी बंडोपंत वाडकर, बापूसो गोंगाणे, बापूसो व्हटकर, जयसिंग साळवी आणि केरबा पाटील यांनी तत्कालीन साखर संचालक वाय. व्ही. सुर्वे यांच्याकडे केली होती. मात्र, या चौकशीला सत्ताधारी संचालक मंडळाने सन २०१४-२०१५ मध्ये स्थगिती आणली होती. त्यांच्यावर निर्णय होऊन सदर स्थगिती उठविण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. के. तातेड यांनी स्थगिती उठवत सदर दावाच रद्द केला आहे. त्यानुसार साखर संचालक सचिन रावळ यांनी अर्जदारांच्या मागणीनुसार विशेष लेखापरीक्षक के. बी. तेलंग यांची नियुक्ती करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयातील रिटपिटीशियन नं. ७९७९/२०१४ दि. ९ सप्टेंबर २०१४ चे आदेशाप्रमाणे योग्य कार्यवाही करून पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश तेलंग यांना देण्यात आले आहेत. स्थानिक सदस्य संस्था निवडणुका आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या पार्श्वभूमीवर झालेल्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा दणका बसला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चौकट
सन २०१०/२०११/२०१२/२०१३ या कार्यकाळात मोलॅसिस विक्रीत कोट्यवधी रुपयांचा पाडलेला ढपला, बगॅस विक्रीत लाखो रुपयांचा झालेला कारखान्याचा तोटा, स्क्रॅप विक्रीचे मूल्यांकन, खरेदीतील अनागोंदी यावर तक्रार करून, सविस्तर चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार ही चौकशी केली जाणार आहे.