शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

लोकसभा अध्यक्षांवर दबाव आणला!

By admin | Updated: August 15, 2015 01:44 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या ‘दबावा’मुळेच स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ललित मोदी वादावर चर्चा करण्याची परवानगी दिली, असा दावा काँग्रेसने केला आहे.ललित मोदी वाद आणि व्यापमं घोटाळ्यावरून संसदेचे कामकाज सतत ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना लक्ष्य बनविण्याच्या उद्देशाने अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात सरकार स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चेसाठी राजी झाले, असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे संयुक्त पत्रपरिषदेत केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया जाण्यासाठी एकटा भाजप आणि रालोआ सरकारच जबाबदार असल्याचे सांगून खरगे म्हणाले, सरकारने दबाव आणल्यानंतरच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चर्चेला अनुमती दर्शविली. त्याआधी चर्चेची परवानगी लेखी स्वरूपात नाकारणाऱ्या महाजन यांनी अचानक चर्चेला होकार दिल्याबद्दल आश्चर्य वाटते. त्या सरकारच्या दबावात होत्या, असे यावरून दिसते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विनंती केल्यानंतर आणि संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी त्याचे अनुमोदन केल्यानंतर महाजन यांनी स्थगन प्रस्तावाअंतर्गत ललित मोदी वादावर चर्चा करण्याची परवानगी दिली होती, हे येथे उल्लेखनीय आहे. खरगे म्हणाले, पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच लोकसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ललित मोदी वादावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत होता; परंतु लोकसभा अध्यक्ष रोज आमची ही मागणी फेटाळून लावत होत्या; पण अचानक अधिवेशन समाप्तीस आले असताना त्यांनी सरकारच्या दबावामुळे स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चेला परवानगी दिली.आता सरकार विरोधकांना लक्ष्य बनवीत असले तरी काँग्रेसच्या सहकार्याने अनेक विधेयके पारित झालेल्या आधीच्या अधिवेशनातील १२८ टक्के कामकाज सुरळीतपणे चालल्याचे श्रेय आम्हाला देऊ इच्छित नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)