शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

लोकसभा अध्यक्षांवर दबाव आणला!

By admin | Updated: August 15, 2015 01:44 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांची मागणी सलग चार आठवड्यांपर्यंत फेटाळून लावणाऱ्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केवळ सरकारकडून आलेल्या ‘दबावा’मुळेच स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ललित मोदी वादावर चर्चा करण्याची परवानगी दिली, असा दावा काँग्रेसने केला आहे.ललित मोदी वाद आणि व्यापमं घोटाळ्यावरून संसदेचे कामकाज सतत ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना लक्ष्य बनविण्याच्या उद्देशाने अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात सरकार स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चेसाठी राजी झाले, असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे संयुक्त पत्रपरिषदेत केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया जाण्यासाठी एकटा भाजप आणि रालोआ सरकारच जबाबदार असल्याचे सांगून खरगे म्हणाले, सरकारने दबाव आणल्यानंतरच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चर्चेला अनुमती दर्शविली. त्याआधी चर्चेची परवानगी लेखी स्वरूपात नाकारणाऱ्या महाजन यांनी अचानक चर्चेला होकार दिल्याबद्दल आश्चर्य वाटते. त्या सरकारच्या दबावात होत्या, असे यावरून दिसते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विनंती केल्यानंतर आणि संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी त्याचे अनुमोदन केल्यानंतर महाजन यांनी स्थगन प्रस्तावाअंतर्गत ललित मोदी वादावर चर्चा करण्याची परवानगी दिली होती, हे येथे उल्लेखनीय आहे. खरगे म्हणाले, पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच लोकसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून ललित मोदी वादावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत होता; परंतु लोकसभा अध्यक्ष रोज आमची ही मागणी फेटाळून लावत होत्या; पण अचानक अधिवेशन समाप्तीस आले असताना त्यांनी सरकारच्या दबावामुळे स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चेला परवानगी दिली.आता सरकार विरोधकांना लक्ष्य बनवीत असले तरी काँग्रेसच्या सहकार्याने अनेक विधेयके पारित झालेल्या आधीच्या अधिवेशनातील १२८ टक्के कामकाज सुरळीतपणे चालल्याचे श्रेय आम्हाला देऊ इच्छित नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)