शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात अखेर राष्ट्रपती राजवट

By admin | Updated: January 10, 2015 00:08 IST

जम्मू-काश्मिरातील सरकार स्थापण्याचा तिढा सुटू न शकल्याने शुक्रवारी अखेर राष्ट्रपती राजवट लागू होताच या राज्यात नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ झाला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील सरकार स्थापण्याचा तिढा सुटू न शकल्याने शुक्रवारी अखेर राष्ट्रपती राजवट लागू होताच या राज्यात नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती राजवटीवर मंजुरीची मोहोर उमटवली.८७ सदस्यीय विधानसभेत त्रिशंकू जनादेश मिळाल्यानंतर सरकार स्थापण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ जमविण्यात अपयश आल्याने आता परस्परांना दोष देण्याची खेळी (ब्लेमगेम)सुरू झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पदमुक्त करण्याची विनंती केल्यानंतर राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी काल राष्ट्रपतींना अहवाल सादर केला होता. या अहवालात विविध मुद्यांसोबतच कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यास राष्ट्रपती राजवटीचा पर्यायही ठेवला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी रात्रीच हा अहवाल पुढील निर्णयासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला होता.जम्मू-काश्मीरच्या घटनेनुसार राज्यपाल कोणतीही संवैधानिक यंत्रणा सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याच्या स्थितीत राष्ट्रपती शासनाची घोषणा करू शकतात. अट्टाहास नडलापीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पूर्ण सहा वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवण्याचा अट्टाहास बाळगत कोंडी कायम ठेवली. सईद यांनी मुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी चालवाव्या यासाठी जनता दीर्घ काळ प्रतीक्षा करू शकत नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.ओमर जबाबदारआमच्याकडे १९ जानेवारीपर्यंत मुदत होती; मात्र ओमर यांनीच पदमुक्त होत ही परिस्थिती ओढवून आणली आहे. लवकरच आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यात यश येईल, अशी आशा आहे, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर म्हणाले.सावध पवित्राउद्भवलेली परिस्थिती पाहून भाजपाने पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांसोबत सरकार स्थापण्यासाठी चर्चा चालविली होती. घटनात्मक मर्यादा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भूमिका महत्त्वाची होती, असे केंद्रीय मंत्री रविशंकर म्हणाले.पर्याय शोधायला हवे होतेसर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला सरकार स्थापन करण्यात अपयश आले हे निराशाजनक आहे. तीन विभागातील जनतेने पीडीपीला पसंती दर्शविली असताना या पक्षाने सरकार स्थापण्याचे पर्याय शोधायला हवे होते, असे काँग्रेस नेते जी.एस. चरक म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)जम्मू-काश्मिरात १९७७ नंतर सहाव्यांदा राष्ट्रपती राजवट लावली जात आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ १९ जानेवारीपर्यंत असल्याने नव्या सरकारची स्थापना करणे बंधनकारक होते. ओमर अब्दुल्ला यांनी तातडीने पदमुक्त करण्याची विनंती करताच राज्यपालांना गृहमंत्रालयाला लगेच अहवाल पाठविणे भाग पडले. गेल्या १२ वर्षांत हे राज्य दुसऱ्यांदा या अवस्थेतून जात आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी तत्कालीन राज्यपाल जी.सी. सक्सेना यांना पदमुक्त करण्याची विनंती करताच राष्ट्रपती राजवटीचा मार्ग अवलंबावा लागला होता. १८ आॅक्टोबर २००२ रोजी एका पंधरवड्यासाठी राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती.राष्ट्रपती राजवट लागू होताच नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे पक्ष परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करु लागले आहेत. दीर्घ काळ गुंता कायम ठेवल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, असे सांगताना त्यांनी परस्परांवर हल्ले केले. भाजपाने पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स या दोघांशी चर्चेचा प्रयत्न केल्याचे सांगत सावध भूमिका अवलंबली आहे.