शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

जम्मू-काश्मिरात अखेर राष्ट्रपती राजवट

By admin | Updated: January 10, 2015 00:08 IST

जम्मू-काश्मिरातील सरकार स्थापण्याचा तिढा सुटू न शकल्याने शुक्रवारी अखेर राष्ट्रपती राजवट लागू होताच या राज्यात नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ झाला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील सरकार स्थापण्याचा तिढा सुटू न शकल्याने शुक्रवारी अखेर राष्ट्रपती राजवट लागू होताच या राज्यात नव्या राजकीय अध्यायाला प्रारंभ झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती राजवटीवर मंजुरीची मोहोर उमटवली.८७ सदस्यीय विधानसभेत त्रिशंकू जनादेश मिळाल्यानंतर सरकार स्थापण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ जमविण्यात अपयश आल्याने आता परस्परांना दोष देण्याची खेळी (ब्लेमगेम)सुरू झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पदमुक्त करण्याची विनंती केल्यानंतर राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी काल राष्ट्रपतींना अहवाल सादर केला होता. या अहवालात विविध मुद्यांसोबतच कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यास राष्ट्रपती राजवटीचा पर्यायही ठेवला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी रात्रीच हा अहवाल पुढील निर्णयासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला होता.जम्मू-काश्मीरच्या घटनेनुसार राज्यपाल कोणतीही संवैधानिक यंत्रणा सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याच्या स्थितीत राष्ट्रपती शासनाची घोषणा करू शकतात. अट्टाहास नडलापीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पूर्ण सहा वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवण्याचा अट्टाहास बाळगत कोंडी कायम ठेवली. सईद यांनी मुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी चालवाव्या यासाठी जनता दीर्घ काळ प्रतीक्षा करू शकत नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.ओमर जबाबदारआमच्याकडे १९ जानेवारीपर्यंत मुदत होती; मात्र ओमर यांनीच पदमुक्त होत ही परिस्थिती ओढवून आणली आहे. लवकरच आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यात यश येईल, अशी आशा आहे, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर म्हणाले.सावध पवित्राउद्भवलेली परिस्थिती पाहून भाजपाने पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांसोबत सरकार स्थापण्यासाठी चर्चा चालविली होती. घटनात्मक मर्यादा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भूमिका महत्त्वाची होती, असे केंद्रीय मंत्री रविशंकर म्हणाले.पर्याय शोधायला हवे होतेसर्वात मोठा पक्ष असलेल्या पीडीपीला सरकार स्थापन करण्यात अपयश आले हे निराशाजनक आहे. तीन विभागातील जनतेने पीडीपीला पसंती दर्शविली असताना या पक्षाने सरकार स्थापण्याचे पर्याय शोधायला हवे होते, असे काँग्रेस नेते जी.एस. चरक म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)जम्मू-काश्मिरात १९७७ नंतर सहाव्यांदा राष्ट्रपती राजवट लावली जात आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ १९ जानेवारीपर्यंत असल्याने नव्या सरकारची स्थापना करणे बंधनकारक होते. ओमर अब्दुल्ला यांनी तातडीने पदमुक्त करण्याची विनंती करताच राज्यपालांना गृहमंत्रालयाला लगेच अहवाल पाठविणे भाग पडले. गेल्या १२ वर्षांत हे राज्य दुसऱ्यांदा या अवस्थेतून जात आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी तत्कालीन राज्यपाल जी.सी. सक्सेना यांना पदमुक्त करण्याची विनंती करताच राष्ट्रपती राजवटीचा मार्ग अवलंबावा लागला होता. १८ आॅक्टोबर २००२ रोजी एका पंधरवड्यासाठी राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती.राष्ट्रपती राजवट लागू होताच नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे पक्ष परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करु लागले आहेत. दीर्घ काळ गुंता कायम ठेवल्यानेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, असे सांगताना त्यांनी परस्परांवर हल्ले केले. भाजपाने पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स या दोघांशी चर्चेचा प्रयत्न केल्याचे सांगत सावध भूमिका अवलंबली आहे.