शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या 'एक देश एक निवडणूक' भुमिकेला राष्ट्रपतींचा पाठिंबा

By admin | Updated: September 6, 2016 13:32 IST

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती ज्याला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  'एक देश एक निवडणूक' भुमिकेला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती. सोमवारी शिक्षक दिनानिमित्त एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींच्या या भुमिकेला आपलं समर्थन असल्याचं सांगितलं.
 
प्रणब मुखर्जी यांनी राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. एका विद्यार्थ्याने प्रणब मुखर्जी यांना निवडणूकीवरील खर्च टाळण्यासाठी सर्व निवडणुका एकाचवेळी घेणं योग्य होईल का ? असा प्रश्न विचारला. उत्तर देताना प्रणब मुखर्जी यांनी ' सर्व निवडणूका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कल्पना मांडणं गरजेचं आहे, आणि ते सर्वांच्या फायद्याचं असेल. सततच्या निवडणुकांमुळे देशाच्या विकासाच्या कामांवर परिणाम होतो', असं बोलले आहेत.
 
'देशभरात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणूक सुरु असते. त्यामुळे प्रशासनातील मोठी कुमक या निवडणुकांसाठी काम करत असते. विविध निवडणुकांमुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे सरकारला नवे निर्णय घेता येत नाही आणि सर्व कामकाजही ठप्प होतं', असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
राष्ट्रपतींनी इतक्या नम्रतेने उत्तर दिल्याबद्दल रागिनी या विद्यार्थिनीने आश्चर्य व्यक्त करत आपला विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली. प्रणब मुखर्जी यांनी यावेळी दहशतवादावरही चर्चा केली. 'सीमारेषेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले आपल्याला सहन करावे लागत आहेत. आपल्या देशात वाढणारा दहशतवाद यावर आपल्या सरकार आणि प्रशासनाचं यश अवलंबून असतो. घरातील दहशतवाद हा जगातील सर्वात मोठा धोका आहे , जो अद्याप भारताला नाही', असं प्रणब मुखर्जी बोलले आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र निवडणुकीचा प्रस्ताव मार्चमध्ये पार पडलेल्या भाजपा बैठकीत ठेवला होता. यामुळे दरवर्षी निवडणुकीवर होणारा खर्च कमी होईल अशी मोदींची भुमिका होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2004 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर 4500 कोटी खर्च झाले आहेत. मोदींच्या या भुमिकेला निवडणूक आयोगानेही पाठिंबा दर्शवला होता.
 
विनाकारण खर्च टाळण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका तुम्हाला पटते का ? तुमच्या प्रतिक्रिया कळवा