शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पंतप्रधान मोदींच्या 'एक देश एक निवडणूक' भुमिकेला राष्ट्रपतींचा पाठिंबा

By admin | Updated: September 6, 2016 13:32 IST

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती ज्याला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  'एक देश एक निवडणूक' भुमिकेला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती. सोमवारी शिक्षक दिनानिमित्त एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींच्या या भुमिकेला आपलं समर्थन असल्याचं सांगितलं.
 
प्रणब मुखर्जी यांनी राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. एका विद्यार्थ्याने प्रणब मुखर्जी यांना निवडणूकीवरील खर्च टाळण्यासाठी सर्व निवडणुका एकाचवेळी घेणं योग्य होईल का ? असा प्रश्न विचारला. उत्तर देताना प्रणब मुखर्जी यांनी ' सर्व निवडणूका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कल्पना मांडणं गरजेचं आहे, आणि ते सर्वांच्या फायद्याचं असेल. सततच्या निवडणुकांमुळे देशाच्या विकासाच्या कामांवर परिणाम होतो', असं बोलले आहेत.
 
'देशभरात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणूक सुरु असते. त्यामुळे प्रशासनातील मोठी कुमक या निवडणुकांसाठी काम करत असते. विविध निवडणुकांमुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे सरकारला नवे निर्णय घेता येत नाही आणि सर्व कामकाजही ठप्प होतं', असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
राष्ट्रपतींनी इतक्या नम्रतेने उत्तर दिल्याबद्दल रागिनी या विद्यार्थिनीने आश्चर्य व्यक्त करत आपला विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली. प्रणब मुखर्जी यांनी यावेळी दहशतवादावरही चर्चा केली. 'सीमारेषेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले आपल्याला सहन करावे लागत आहेत. आपल्या देशात वाढणारा दहशतवाद यावर आपल्या सरकार आणि प्रशासनाचं यश अवलंबून असतो. घरातील दहशतवाद हा जगातील सर्वात मोठा धोका आहे , जो अद्याप भारताला नाही', असं प्रणब मुखर्जी बोलले आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र निवडणुकीचा प्रस्ताव मार्चमध्ये पार पडलेल्या भाजपा बैठकीत ठेवला होता. यामुळे दरवर्षी निवडणुकीवर होणारा खर्च कमी होईल अशी मोदींची भुमिका होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2004 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर 4500 कोटी खर्च झाले आहेत. मोदींच्या या भुमिकेला निवडणूक आयोगानेही पाठिंबा दर्शवला होता.
 
विनाकारण खर्च टाळण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका तुम्हाला पटते का ? तुमच्या प्रतिक्रिया कळवा