शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अधिकारवाद राष्ट्रपतींच्या कोर्टात

By admin | Updated: May 20, 2015 02:28 IST

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात अधिकारावरून उफाळून आलेला वाद शिगेला पोहोचला

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात अधिकारावरून उफाळून आलेला वाद शिगेला पोहोचला असताना उभयतांनी मंगळवारी येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन एकमेकांवर अधिकार क्षेत्रात अतिक्रमणाद्वारे राज्यघटनेच्या उल्लंघनाचा आरोप केला. आता राष्ट्रपती या वादावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या दोघांनीही अधिकार क्षेत्राच्या व्याप्तीबाबत कायदेशीर सल्लामसलत सुरू केली आहे. केजरीवाल राष्ट्रपतींना भेटण्याच्या काही तासांपूर्वीच जंग यांनी अचानक राष्ट्रपतींची भेट घेतली व त्यांना हंगामी मुख्य सचिव शकुंतला गामलिन व इतर सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून उफाळून आलेल्या मतभेदांची माहिती दिली. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनाही भेटले. गृहमंत्री बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत येते. नायब राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी राज्यघटना व नियमानुसार आपआपल्या कर्तव्याचे पालन करावे, असे गृह मंत्रालयाचे मत आहे. केजरीवाल नियोजित वेळेनुसार सायंकाळी राष्ट्रपतींना भेटले. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुद्धा त्यांच्यासमवेत होते. नायब राज्यपाल दिल्लीत राष्ट्रपती शासन असल्यासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार असताना जंग हे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना बेदखल करून अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत,अशी तक्रार केजरीवाल यांनी राष्ट्रपतींकडे केली. तिकडे जंग यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहात आपल्याला अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांचा अधिकार असून आपली कुठलीही कृती असंवैधानिक नाही, असे राष्ट्रपतींना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)केजरीवाल व जंग यांच्यातील भांडणाचे मूळ १९९८ साली वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या एका आदेशात दडले आहे. त्यावेळी दिल्लीत भाजपचे साहिबसिंग वर्मा हे मुख्यमंत्री होते. अधिसूचनेनुसार जीएनसीटीडी १९९१ (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली) मध्ये समाविष्ट नियमांशिवाय सर्व विषयांवर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणे बंधनकारक केले. आदेशाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा अधिकार मिळाला. असे सांगितले जाते की वर्मा यांच्या विनंतीवरून अडवाणी हा आदेश काढण्यास तयार झाले. परंतु त्यानंतर भाजप पुन्हा दिल्लीत सत्तारूढ झाली नाही.विधिज्ञ आप सरकारसोबत४हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीसंदर्भात नायब राज्यपालांच्या अधिकाराच्या मुद्यावर सरकारने विधिज्ञांशी कायदेशीर विचारविनिमय सुरू केला आहे. राजीव धवन व इंदिरा जयसिंग यांनी सरकारची बाजू घेत या प्रकरणी नायब राज्यपालांना कुठलाही स्वतंत्र विशेषाधिकार नसल्याचे स्पष्ट केले. ४आप सरकारने नायब राज्यपालांची दखल न घेता ज्येष्ठ सनदी अधिकारी अरविंद राय यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे राय यांच्या नियुक्तीचा आदेश राजेंद्रकुमार यांनी प्रधान सचिव (सेवा) या अधिकाराने काढला.