शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

By admin | Updated: October 8, 2015 04:54 IST

देशाच्या नागरी संस्कृतीतील वैविध्य, सहिष्णुता आणि बहुसंख्यकतेची मूळ मूल्ये जपली जावीत. कोणत्याही परिस्थितीत ही मूल्ये वाया घातली जाऊ नये हे आपल्याला

नवी दिल्ली : देशाच्या नागरी संस्कृतीतील वैविध्य, सहिष्णुता आणि बहुसंख्यकतेची मूळ मूल्ये जपली जावीत. कोणत्याही परिस्थितीत ही मूल्ये वाया घातली जाऊ नये हे आपल्याला ठामपणे मनात ठसवायचे आहे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी केले. दादरीकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विधान देशातील एकूणच परिस्थितीकडे लक्ष वेधणारे असल्याचे मानले जाते.वैविध्य हीच भारताची शतकानुशतकांची परंपरा राहिली आहे. सहिष्णुता आणि बहुसंख्यकता हीच भारतीय संस्कृतीची मूल्ये राहिली आहेत. ती पायदळी तुडवली जाऊ नयेत यावर माझा ठाम विश्वास आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये याच मूल्यांनी आपल्याला एकत्र जोडून ठेवले आहे. अनेक प्राचीन संस्कृती लयाला गेल्या आहेत. आक्रमणांपाठोपाठ आक्रमणे झाली. दीर्घ काळ विदेशी राजवट होती, तरीही भारतीय संस्कृती कायम राहिली, कारण संस्कृतीची मूळ मूल्ये आपल्या मनात रुजली गेली आहेत. ही मूल्ये मनात घट्ट राहिल्यास आपल्या लोकशाहीला समोर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावर ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी लिहिलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले. विशेषत: दादरीकांडानंतर देशभरात उफाळलेले राजकारण पाहता त्यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरते. या कार्यक्रमाला राजनाथसिंग, मुख्तार अब्बास नकवी, अरविंद केजरीवाल, गुलाम नबी आझाद, फारुक अब्दुल्ला आणि अनेक खासदार उपस्थित होते.