शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

By admin | Updated: October 8, 2015 04:54 IST

देशाच्या नागरी संस्कृतीतील वैविध्य, सहिष्णुता आणि बहुसंख्यकतेची मूळ मूल्ये जपली जावीत. कोणत्याही परिस्थितीत ही मूल्ये वाया घातली जाऊ नये हे आपल्याला

नवी दिल्ली : देशाच्या नागरी संस्कृतीतील वैविध्य, सहिष्णुता आणि बहुसंख्यकतेची मूळ मूल्ये जपली जावीत. कोणत्याही परिस्थितीत ही मूल्ये वाया घातली जाऊ नये हे आपल्याला ठामपणे मनात ठसवायचे आहे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी केले. दादरीकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विधान देशातील एकूणच परिस्थितीकडे लक्ष वेधणारे असल्याचे मानले जाते.वैविध्य हीच भारताची शतकानुशतकांची परंपरा राहिली आहे. सहिष्णुता आणि बहुसंख्यकता हीच भारतीय संस्कृतीची मूल्ये राहिली आहेत. ती पायदळी तुडवली जाऊ नयेत यावर माझा ठाम विश्वास आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये याच मूल्यांनी आपल्याला एकत्र जोडून ठेवले आहे. अनेक प्राचीन संस्कृती लयाला गेल्या आहेत. आक्रमणांपाठोपाठ आक्रमणे झाली. दीर्घ काळ विदेशी राजवट होती, तरीही भारतीय संस्कृती कायम राहिली, कारण संस्कृतीची मूळ मूल्ये आपल्या मनात रुजली गेली आहेत. ही मूल्ये मनात घट्ट राहिल्यास आपल्या लोकशाहीला समोर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावर ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी लिहिलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले. विशेषत: दादरीकांडानंतर देशभरात उफाळलेले राजकारण पाहता त्यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरते. या कार्यक्रमाला राजनाथसिंग, मुख्तार अब्बास नकवी, अरविंद केजरीवाल, गुलाम नबी आझाद, फारुक अब्दुल्ला आणि अनेक खासदार उपस्थित होते.