शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राष्ट्रपती मुखर्र्जींकडून पुन्हा सहिष्णुतेचे आवाहन

By admin | Updated: November 22, 2015 03:00 IST

संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा

नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा प्रचार-प्रसार करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.भारततज्ज्ञांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जगाला अजूनही भारताकडून केवळ सहिष्णुताच नाही तर सहानुभूतीच्या विचारांची शिकवण घ्यायची आहे, या स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करून देताना भारत ज्या विचारांसाठी ओळखला जातो त्याचा पुनरुच्चार मुखर्जी यांनी केला. ते म्हणाले की, आज साऱ्या जगात असहिष्णुता आणि द्वेषाचे वातावरण पसरले असून, न भूतो न् भविष्यती अशी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या असहिष्णुतेशी आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे.यावेळी भारताचा आत्मा असलेले उच्च मूल्य, लिखित व अलिखित संस्कार, कर्तव्य आणि जीवनशैलीच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवू शकते, असेही मुखर्जी यांनी अधोरेखित केले. गोमांस सेवनाच्या अफवेवरून दादरीत घडलेले हत्याकांड आणि त्यानंतरच्या घटनांपासूनच मुखर्जी सहिष्णुता बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. (वृत्तसंस्था)