शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

राष्ट्रपती मुखर्र्जींकडून पुन्हा सहिष्णुतेचे आवाहन

By admin | Updated: November 22, 2015 03:00 IST

संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा

नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा प्रचार-प्रसार करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.भारततज्ज्ञांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जगाला अजूनही भारताकडून केवळ सहिष्णुताच नाही तर सहानुभूतीच्या विचारांची शिकवण घ्यायची आहे, या स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करून देताना भारत ज्या विचारांसाठी ओळखला जातो त्याचा पुनरुच्चार मुखर्जी यांनी केला. ते म्हणाले की, आज साऱ्या जगात असहिष्णुता आणि द्वेषाचे वातावरण पसरले असून, न भूतो न् भविष्यती अशी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या असहिष्णुतेशी आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे.यावेळी भारताचा आत्मा असलेले उच्च मूल्य, लिखित व अलिखित संस्कार, कर्तव्य आणि जीवनशैलीच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवू शकते, असेही मुखर्जी यांनी अधोरेखित केले. गोमांस सेवनाच्या अफवेवरून दादरीत घडलेले हत्याकांड आणि त्यानंतरच्या घटनांपासूनच मुखर्जी सहिष्णुता बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. (वृत्तसंस्था)