शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवृष्टीला तोंड देण्याची तयारी!

By admin | Updated: May 21, 2015 23:29 IST

यंदा मान्सून सामान्य ते कमी होण्याचा अनुमान व्यक्त झाल्यानंतर सरकारने आम्ही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहोत

नवी दिल्ली : यंदा मान्सून सामान्य ते कमी होण्याचा अनुमान व्यक्त झाल्यानंतर सरकारने आम्ही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहोत व राज्य सरकारेही या पार्श्वभूमीवर सावध आहेत, असे गुरुवारी म्हटले.ग्राहक खात्याचे सचिव केशव देसिराजू यांनी म्हटले आहे की, ‘सर्व प्रकारची उपाययोजना केली जात आहे. राज्य सरकारेही पुरेशी सावध आहेत. हवामान खात्यानेही पावसाळा कसा असेल याबाबत सावधगिरीने अनुमान व्यक्त केले आहे. गेल्यावर्षीसारखा पावसाळा नसेल, असे अनुमान आहे. या पावसाळ्याचा परिणाम हा पुढच्या वर्षी हाती येणाऱ्या पिकांवर होणार आहे.’ ग्राहक खात्याचा सचिव या नात्याने ग्राहकांना काय उपलब्ध असेल यात मला रस आहे. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त देसिराजू वार्ताहरांशी बोलत होते. हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मान्सून वेळेवर सुरू होईल व एक जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस सामान्यापेक्षाही कमी असेल, असेही अनुमान आहे.गेल्यावर्षी देशात मान्सूनचा पाऊस १२ टक्क्यांनी कमी झाला होता व त्यामुळे खरीप धान्य, कापूस आणि तेलबियांच्या पिकांवर परिणाम झाला होता. कृषी सचिव सिराज हुसेन यांनी गेल्या काही दिवसांत म्हटले होते की कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारांना ५८० जिल्ह्यांमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीतील उपाययोजनांसह तयार राहण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले होते. मान्सूनच्या अनुमानावर आधारित उपाययोजना तयार करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. खते, कीटकनाशके व सूक्ष्म पोषक तत्त्वे यांच्यासह दर्जेदार बियाणांचा साठा करून ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्याही काही घटना घडल्या आहेत.यावर्षी १८ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या दुसऱ्या अनुमानानुसार देशात खाद्यान्न उत्पादन २०१४-२०१५ (जुलै ते जून) वर्षात गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील उत्पादनापेक्षा ३ टक्क्यांनी कमी होऊन २५ कोटी ७०.७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. या उत्पादनात आणखी घटही होऊ शकते. कारण यावर्षी अनेक राज्यांमध्ये मार्च व एप्रिलदरम्यान अवकाळी व गारांचा पाऊस झाला व त्यामुळे गव्हासोबत रबीच्या पिकांवर परिणाम झाला.४ ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा करण्याबद्दल देसिराजू म्हणाले की, हे विधेयक संसदेत लवकरच मांडले जाईल.४ ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण होईल, अशी तरतूद (युरोप व अमेरिकन कायद्यात आहे तशी) ग्राहक संरक्षण प्राधिकार व अन्य दुरुस्त्यांसह प्रस्तावित आहे.