शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवृष्टीला तोंड देण्याची तयारी!

By admin | Updated: May 21, 2015 23:29 IST

यंदा मान्सून सामान्य ते कमी होण्याचा अनुमान व्यक्त झाल्यानंतर सरकारने आम्ही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहोत

नवी दिल्ली : यंदा मान्सून सामान्य ते कमी होण्याचा अनुमान व्यक्त झाल्यानंतर सरकारने आम्ही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहोत व राज्य सरकारेही या पार्श्वभूमीवर सावध आहेत, असे गुरुवारी म्हटले.ग्राहक खात्याचे सचिव केशव देसिराजू यांनी म्हटले आहे की, ‘सर्व प्रकारची उपाययोजना केली जात आहे. राज्य सरकारेही पुरेशी सावध आहेत. हवामान खात्यानेही पावसाळा कसा असेल याबाबत सावधगिरीने अनुमान व्यक्त केले आहे. गेल्यावर्षीसारखा पावसाळा नसेल, असे अनुमान आहे. या पावसाळ्याचा परिणाम हा पुढच्या वर्षी हाती येणाऱ्या पिकांवर होणार आहे.’ ग्राहक खात्याचा सचिव या नात्याने ग्राहकांना काय उपलब्ध असेल यात मला रस आहे. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त देसिराजू वार्ताहरांशी बोलत होते. हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मान्सून वेळेवर सुरू होईल व एक जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस सामान्यापेक्षाही कमी असेल, असेही अनुमान आहे.गेल्यावर्षी देशात मान्सूनचा पाऊस १२ टक्क्यांनी कमी झाला होता व त्यामुळे खरीप धान्य, कापूस आणि तेलबियांच्या पिकांवर परिणाम झाला होता. कृषी सचिव सिराज हुसेन यांनी गेल्या काही दिवसांत म्हटले होते की कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारांना ५८० जिल्ह्यांमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीतील उपाययोजनांसह तयार राहण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले होते. मान्सूनच्या अनुमानावर आधारित उपाययोजना तयार करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. खते, कीटकनाशके व सूक्ष्म पोषक तत्त्वे यांच्यासह दर्जेदार बियाणांचा साठा करून ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्याही काही घटना घडल्या आहेत.यावर्षी १८ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या दुसऱ्या अनुमानानुसार देशात खाद्यान्न उत्पादन २०१४-२०१५ (जुलै ते जून) वर्षात गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील उत्पादनापेक्षा ३ टक्क्यांनी कमी होऊन २५ कोटी ७०.७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. या उत्पादनात आणखी घटही होऊ शकते. कारण यावर्षी अनेक राज्यांमध्ये मार्च व एप्रिलदरम्यान अवकाळी व गारांचा पाऊस झाला व त्यामुळे गव्हासोबत रबीच्या पिकांवर परिणाम झाला.४ ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा करण्याबद्दल देसिराजू म्हणाले की, हे विधेयक संसदेत लवकरच मांडले जाईल.४ ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण होईल, अशी तरतूद (युरोप व अमेरिकन कायद्यात आहे तशी) ग्राहक संरक्षण प्राधिकार व अन्य दुरुस्त्यांसह प्रस्तावित आहे.