शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना भरपाई देण्यास केंद्र तयार

By admin | Updated: March 20, 2015 02:16 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सर्व आर्थिक साह्य करावे, या काँग्रेससह सर्व पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजूला सारत केलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने होकार दिला. उ

नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सर्व आर्थिक साह्य करावे, या काँग्रेससह सर्व पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजूला सारत केलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने होकार दिला. उत्तर आणि पश्चिम भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेले शेतीचे प्रचंड नुकसान आणि त्यावर व्यक्त झालेली एकमुखी चिंता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सरकार पूर्ण सहानुभूतीने विचार करेल आणि तांत्रिक बाबींच्या खोलात न जाता मदत करेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. कृषी मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र चमू स्थापन केल्या असून, सर्व तीन मंत्र्यांनी गुरुवारपासून विविध राज्यांना भेटी देणे चालविले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन सरकारने तत्काळ मदत घोषित करावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस, बसपा, संजद आणि माकपने केली. पवारांच्या मागणीचे एकमुखी समर्थनअवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या तसेच कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज रद्द करण्याची मागणी करताना शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे असल्याकडे दीर्घ भाषणात लक्ष वेधले. त्यांच्या मागणीला विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून समर्थन दिले. मंत्रिगट स्थापन कराअस्मानी संकटामुळे २२ हजार कोटी रुपयांच्या घरात पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने नुकसानीचा आढावा घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करण्यासाठी मंत्रिगटांची स्थापना केली होती. उलटपक्षी सध्या सर्व मंत्रिगट विसर्जित करण्यात आले आहेत. ते त्वरित स्थापन करा अशी मागणी संजदचे के.सी. त्यागी यांनी केली. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीचा योग्य आढावा घेऊन भ्रष्टाचारमुक्त नुकसानभरपाई दिली जावी. - गुलाम नबी आझाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते.तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशासाठी भाग्यशाली असल्याचा दावा केला, प्रत्यक्षात संपूर्ण देशात कृषिसंकट उभे ठाकले आहे. - सीताराम येचुरी, माकपा नेते