शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

शेतकऱ्यांना भरपाई देण्यास केंद्र तयार

By admin | Updated: March 20, 2015 02:16 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सर्व आर्थिक साह्य करावे, या काँग्रेससह सर्व पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजूला सारत केलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने होकार दिला. उ

नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सर्व आर्थिक साह्य करावे, या काँग्रेससह सर्व पक्षांनी राजकीय अभिनिवेश बाजूला सारत केलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने होकार दिला. उत्तर आणि पश्चिम भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेले शेतीचे प्रचंड नुकसान आणि त्यावर व्यक्त झालेली एकमुखी चिंता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सरकार पूर्ण सहानुभूतीने विचार करेल आणि तांत्रिक बाबींच्या खोलात न जाता मदत करेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. कृषी मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र चमू स्थापन केल्या असून, सर्व तीन मंत्र्यांनी गुरुवारपासून विविध राज्यांना भेटी देणे चालविले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन सरकारने तत्काळ मदत घोषित करावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस, बसपा, संजद आणि माकपने केली. पवारांच्या मागणीचे एकमुखी समर्थनअवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या तसेच कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज रद्द करण्याची मागणी करताना शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे असल्याकडे दीर्घ भाषणात लक्ष वेधले. त्यांच्या मागणीला विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून समर्थन दिले. मंत्रिगट स्थापन कराअस्मानी संकटामुळे २२ हजार कोटी रुपयांच्या घरात पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने नुकसानीचा आढावा घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करण्यासाठी मंत्रिगटांची स्थापना केली होती. उलटपक्षी सध्या सर्व मंत्रिगट विसर्जित करण्यात आले आहेत. ते त्वरित स्थापन करा अशी मागणी संजदचे के.सी. त्यागी यांनी केली. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीचा योग्य आढावा घेऊन भ्रष्टाचारमुक्त नुकसानभरपाई दिली जावी. - गुलाम नबी आझाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते.तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशासाठी भाग्यशाली असल्याचा दावा केला, प्रत्यक्षात संपूर्ण देशात कृषिसंकट उभे ठाकले आहे. - सीताराम येचुरी, माकपा नेते