शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शब्द वगळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली शंका : मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशभरात हिंदुत्वाच्या मुद्दावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न गंभीर आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्याचे उदात्तीकरण असो किंवा सविधानाच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळणे असो हे त्यातलेच प्रकार आहेत. मुळात घटना बदलविण्याची मानसिकताच भाजपची आहे. त्यामुळे हे शब्द वगळणे ही तांत्रिक चूक वाटत नाही तर तसे जाणीवपूर्वक केले गेले असावे अशी शंका येते. एखादी गोष्ट करून त्याचे काय पडसाद उमटतात याची चाचणी घेण्याचाच ही खेळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात त्यांची भूमिका सष्ट करावी. हिंदुत्वाच्या अजेंड्याला समर्थन असेल तर तसे जाहीर करावे किंवा विरोध असेल तर तो स्पष्ट करावा, असे चव्हाण म्हणाले.
राज्यात पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी बोलणे टाळले (प्रतिनिधी)
चौकट करावी
तर नटराजन यांच्यावर
कारवाई करावी
संविधानाला साक्षी ठेवून मंत्री शपथ घेत असल्याने त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे कायद्याच्या चौकटीतच असणे अपेक्षित असते. अशा वेळी कोणाच्या सांगण्यावरून जर मंत्री जयंती नटराजन यांनी निर्णय घेतले असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपावर दिली. राहुल गांधींवर केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. राजकीय क्षेत्रात काम करताना एक नेता म्हणून त्यांच्याकडे आलेले पत्र संबंधितांकडे पाठवावे लागते. मात्र त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्र्यांना असतात, असे ते म्हणाले.