शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

यूपीतील मंदिरांमध्ये मिळणार दूधापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 10:27 IST

उत्तर प्रदेशमधील मंदिरांमध्ये गायीच्या दूधापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद भाविकांना मिळणार आहे

ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 19- उत्तर प्रदेशमधील मंदिरांमध्ये गायीच्या दूधापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद भाविकांना मिळणार आहे. येत्या नवरात्रीपासून दुधापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद मंदिरात येणाऱ्या भाविकांना दिला जाणार आहे. दुग्धविकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. गायीच्या दुग्ध उत्पादनांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं आहे. सध्या उत्तर प्रदेशातील मोठ्या धार्मिक स्थळांवर याची सुरूवात करणार असल्याचही लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितलं.
 
उत्तर प्रदेशमध्ये म्हशीचं दूध ३५ रूपये लिटर आणि गायीचं दूध २२ रूपये लिटर दराने मिळतं. राज्य सरकार गायीचे दूध ४० ते ४२ रूपये लिटर दरापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे गायीचं योग्य पालनपोषण होऊ शकेल आणि उत्पन्न मिळत नसल्याचं कारण देत त्यांना कोणी सोडूनही देणार नाही. छत्तीसगडमध्ये गायीचं दूध ६० रूपये लिटरने तर मथुरामध्ये ४५ रूपये दराने विकलं जाते. गायीच्या दुधापासून बनलेले तूप ११०० रूपये प्रतिकिलो दराने विकलं जातं, असं दुग्धविकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितलं आहे. 
आणखी वाचा
 

स्वतंत्र झेंड्याची कर्नाटकची मागणी केंद्राने फेटाळली

सरींचा जोर कायम; पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

‘लोकमत’तर्फे आज दिल्लीत ८ आदर्श संसदपटूंचा गौरव !

दुग्धविकास विभाग गायीच्या दुधापासून बनवलेल्या उत्पादनांना नवरात्रीपासून बाजारात आणण्यासाठीची तयारी करत आहे. विशेषकरून विंध्याचल, काशी, मथुरा, अयोध्यासारख्या मोठ्या धार्मिक  स्थळांमध्ये गायीच्या दुधापासून बनवलेली मिठाई उपलब्ध करण्याची तयारी सरकार करतं आहे. उत्पादन वाढलं तरच गायीच्या दुधाला किंमत मिळेल तसंच लोकही गायीचं संरक्षण करतील, असं लक्ष्मीनारायण चौधरी म्हणाले आहेत.

आम्ही हिंदुत्वाच्या अजेंड्यासाठी गायीचा मुद्या पुढे करत असल्याची टीका विरोधी पक्ष करतो. वास्तव हे आहे की, गायीच्या दुधामुळे मनुष्याची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. गायीचे दूध किडनी, कर्करोगसारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलही वाढण्यापासून रोखण्यास मदत होते, असेही त्यांनी या वेळी सांगितलं आहे.