शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून तेजस्वी यादवची पाठराखण

By admin | Updated: July 15, 2017 12:44 IST

भाजपात असूनही नेहमी पक्षावर सडेतोड टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी राजीनाम्याची टांगती तलावर डोक्यावर घेऊन फिरणा-या तेजस्वी यादवचा बचाव केला आहे

ऑनलाइन लोकमत
नली दिल्ली, 15 - तेजस्वी यादवमुळे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या पक्षातील अंतर सध्या वाढत चाललं आहे. दरम्यान भाजपात असूनही नेहमी पक्षावर सडेतोड टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी राजीनाम्याची टांगती तलावर डोक्यावर घेऊन फिरणा-या तेजस्वी यादवचा बचाव केला आहे. "फक्त आरोप लागलेत म्हणून राजीनामा देण्याची गरज नाही. याआधीही अनेक वेळा असं झालं आहे", असं शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत.  
 
आणखी वाचा
८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू
चारा घोटाळ्यावेळी लालूप्रसाद ‘क्लीन शेव्हड्’ होते, उद्धव ठाकरेंचा तेजस्वी यादवला टोला
"पहा, लालूंचा मुलगा कसा गुंडागर्दी वाढवत आहे", तेजस्वी यांचे ट्विट
 
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, "जर आरोपांच्या आधारे एखाद्याचा राजीनामा घेत असाल, तर याआधी असं कधी झालं आहे का. अनेक असे पक्ष आहेत ज्यांच्यावर फक्त एफआयरआरच नाही तर चार्जशीट दाखल झाली असूनही अद्याप आपल्या पदावर कायम आहेत".
 
"मला बातम्या किंवा अफवांच्या आधारे काही बोलू इच्छित नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. नितीश कुमार आणि लालू यादव दोघेही परिपक्व आहेत. यावेळी सर्वांनी बिहारच्या हिताकडे लक्ष दिलं पाहिजे", असं मत शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. "लवकरच राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळं तेजस्वी यांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र असू शकतं," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 
 
सोनिया गांधींची मध्यस्थी
आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधी प्रयत्न करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींनी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंत लालूप्रसाद यांनी थोडी नमती भूमिका घेतल्याचं सुत्रांकडून कळत आहे. 
 
राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव देणार राजीनामा - सूत्र
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व काही सुरळीत झालं तर राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव नितीश कुमार सरकारमधून राजीनामा देऊ शकतात. जदयूदेखील तेजस्वीच्या राजीनाम्यावर अडून आहे. जदयूच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यासंबंधी वक्तव्य केली आहेत. 
 
तेजस्वींच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - लालूप्रसाद यादव
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट शब्दात धुडकावून लावली आहे. केवळ गुन्हा दाखल होणे हे राजीनाम्या साठी पुरेसे कारण ठरू शकत नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. लालू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यातील मदभेद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.