शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

यूपीमध्ये शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: January 30, 2017 01:02 IST

उत्तरप्रदेशच्या राजधानीत काँग्रेस आणि सपाच्या रोड शोने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

लखनौ : उत्तरप्रदेशच्या राजधानीत काँग्रेस आणि सपाच्या रोड शोने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. जुन्या लखनौ शहरात या रोड शोचे एका सभेत रुपांतर झाले. यावेळी या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. भाजप आणि बसपला सत्तेपासून रोखणे आणि विकासाचे राजकारण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी हे निवडक श्रीमंत घराण्यांसाठी काम करत आहेत. विजय माल्ल्या आणि ललित मोदी यांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, मोदी सरकारने श्रीमंतांचा काळा पैसा नोटाबंदीच्या माध्यमातून पांढरा केला आहे. तर, गरीबांचे कंबरडे मोडले आहे. ऐतिहासिक घंटाघर येथे गर्दीने खचाखच भरलेल्या परिसरात हे दोन नेते व्यासपीठापर्यंत गर्दीमुळे जाऊ शकले नाहीत. ज्या वाहनावरुन ते रोड शो करत होते त्याच वाहनावरुन त्यांनी जनतेला संबोधित केले.काँग्रेस-सपा आघाडी म्हणजे गंगा-यमुनेचा संगम काँग्रेस आणि सपाची आघाडीम्हणजे गंगा यमुनेचा संगम आहे. यातून विकासाची सरस्वती वाहू लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची नियत चांगली नाही. सपासोबत एकत्र येऊन आपण भाजपच्या व्देष आणि फुटीरवादी राजकारणाशी दोन हात करु, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. येथे संयुक्त पत्रकारपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, या आघाडीमुळे अखिलेश यादव यांच्याशी आपले वैयक्तिक आणि राजकीय संबंध दृढ झाले आहेत. दरम्यान, काँग्रेससोबत आपण ३०० जागा जिंकू असा दावा करताना अखिलेश यादव म्हणाले की, सायकलसोबत जर हात असेल तर विचार करा की त्याची गती काय असेल.राहुल गांधी म्हणाले की, आम्ही पीपीपी म्हणजेच प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी आणि पीस यासाठी काम करणार आहोत. अमेठी आणि रायबरेली येथील जागांबाबत राहुल गांधी यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, हा केंद्रीय मुद्दा नाही. तर, मुद्दा हा आहे की, आम्हाला उत्तरप्रदेश राज्य बदलायचे आहे.दरम्यान, प्रियंका गांधी या निवडणूक प्रचार करणार का? यावर राहुल गांधी म्हणाले की, याबाबत प्रियंका गांधी याच निर्णय घेतील. राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशातील बहुतांश लोकांना मोठा त्रास दिला आहे. तर निवडक श्रीमंतांचे खिसे भरले गेले आहेत. तर अखिलेश यादव म्हणाले की, शेतकरी, गरीब आणि तरुणांसाठी यापुढेही आपण काम करत राहू.