शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 13:57 IST

भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता खादीमध्ये आहे' असे सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते. कोट्यावधी नागरिकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य खादीत आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ - ' भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता खादीमध्ये आहे' असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले होते. सध्याच्या तरूणांमध्ये खादीचे आकर्षण खूप वाढले असून कोट्यावधी नागरिकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या खादीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. नवीन वर्षात मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांसी 'मन की बात'द्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत त्यांनी विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती दिली.
' सध्या खादीच्या माध्यमातून १८ लाख रोजगार निर्मिती झाली आहे. यामध्ये कोट्यवधींना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्याकडे एक खादीचा जोड ठेवला पाहिजे' असे ते म्हणाले. 
दरम्यान आता देशवासियांना ' मन की बात ' कधीही ऐकता येणार. मोबाईवरून 8190881908 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर मन की बात कुठेही व केव्हाही ऐकता येऊ शकेल, असे मोदींनी नमूद केले. ५० टक्के शेतकऱ्यांना पिकविमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
मोदींच्या 'मन की बात' मधील महत्वाचे मुद्दे :
- देशासाठी प्राणांची आहुती देणा-यांना श्रद्धांजली वाहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. दरवर्षी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सव्वाशे कोटी भारतीयांनी २ मिनिटांसाठी मौन पाळावे. 
- भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले आहे. तरूण पिढीसाठीही खादी आकर्षण बनत आहे.
- २६ जानेवारी रोजी हरियाण, गुजरातमध्ये एक अनोखा प्रयोग दिसला. गावातील सर्वात शिक्षित मुलीला ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. या कृतीततून 'बेटी बचाव- बेटी पढाओ'चा एक उत्तम संदेश या कृतीतून देण्यात आला.
- आता 8190881908 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन 'मन की बात' कधीही ऐकता येणे शक्य.
- ५० टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार आहे.
- आंध्र प्रदेशमधील विशाखा पट्टणम येथील समुद्र किनाऱ्यावर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. जगातील प्रमुख देशांची लढाऊ जहाजं व युद्धनौका या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहे. भारताने ही मोहीम आयोजित केल्याचा अभिमान वाटतो.