शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीय संगीतातील आठ दिग्गजांवर टपाल तिकिटे

By admin | Updated: September 4, 2014 01:18 IST

भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली

नवी दिल्ली : असामान्य प्रतिभा आणि उत्तुंग कर्तृत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या समकालीन कालखंडावर स्वत:चा अमीट ठसा उमटविणा:या भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली असून या तिकिटांच्या संचाचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी झाले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या विशेष कार्यक्रमास दळवळणमंत्री रवी शंकर प्रसाद व टपाल विभागाच्या सचिव कावेरी बॅनर्जी उपस्थित होत्या. शास्त्रीय संगीत क्षेत्रतील ज्या दिग्गज कलाकारांवर ही तिकिटे काढली गेली आहेत त्यांत पं. भीमसेन जोशी, पं. रवीशंकर, पं. मल्लिकाजरुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, उस्ताद विलायत अली खान, उस्ताद अली अकबर खान आणि विदुषी डी. के. पट्टामल व गंगूबाई हनगळ यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, भारताची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करण्यात या महान कलाकारांनी दिलेल्या योगदानाची मोजदाद करणो अशक्य आहे. आता हे कलाकार या टपाल तिकिटांच्या रूपाने जगभर पोहोचतील व भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुवर्णकाळाच्या स्मृती चिरंतन ठेवतील. ते म्हणाले,  भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम वेदांमधून झाला व ती एक दैवी देणगी (नादब्रrा) आहे, असे मानले जाते. म्हणूनच विकास आणि जागतिकीकरणाच्या भोवती फिरणा:या आजच्या भारतीय समाजजीवनात हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जपणो महत्त्वाचे आहे.
राष्ट्रपती भवनात नव्याने सुरु झालेल्या वस्तुसंग्रहालयात टपाल तिकिटांचा हा संच कायमस्वरूपी प्रदर्शित केला जाईल व येत्या सप्ताहापासून अभ्यागतांना तो पाहता येईल.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
खा. विजय दर्डा यांचा आग्रह
4आपापल्या क्षेत्रत उत्तुंग कर्तृत्वाचा नवा मापदंड प्रस्थापित करणा:या पं. भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या असामान्य व्यक्तींचे टपाल तिकीट काढण्याबाबत राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांनी वेगळ्य़ा दृष्टिकोनातून आग्रह धरला होता. संबंधित व्यक्तीच्या निधनाला 1क् वर्षे उलटल्याखेरीज तिचे टपाल तिकीट न काढण्याचा नियम खात्याकडून पुढे केला जात होता. 
4तथापि, हा नियम निर्थक असल्याची भूमिका खा. दर्डा यांनी घेतली. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या कलावंताबद्दल जनमनातील आस्था कायम असतानाच्या काळातच हा नियम बाजूला ठेवून टपाल तिकीट काढले पाहिजे, किंबहुना हे कोण होते, अशी अनभिज्ञता समाजात येईर्पयत त्यासाठी वेळ काढता कामा नये, असा आग्रह खा. दर्डा यांनी धरला होता. परिणामी निधनाला चार वर्षे होण्याच्या आत पं. भीमसेन जोशींचे टपाल तिकीट जारी झाले आहे.