शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

कल्याणमधून बेपत्ता झालेला तरूण 'इराक'मध्ये ठार झाल्याची शक्यता

By admin | Updated: August 27, 2014 17:48 IST

'आयएसआयएस' या दहशतवादी संघटनेसाठी काम करणा-या कल्याणमधील तरूणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - 'आयएसआयएस' (इस्लामिक स्टेट ऑफ इराक  अँड सिरीया) या दहशतवादी संघटनेसाठी काम करणा-या कल्याणमधील चार युवकांपैकी एका तरूण, आरिफ माजिद याचा इराकमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. कल्याणमध्ये राहणारे चार तरूण अमन तांडेल, फहाद शेख, आरिफ माजिद व शाहीन तन्की गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करणा-या आरिफचाही समावेश होता.ते चौघेही 'आयएसआयएस'साठी काम करत असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, काही दिवसांनतर आरिफ व तन्की या दोघांनी कुटुंबियांशी संपर्क साधून आपण सीरियातील रक्का प्रांतात या संघनेसाठी काम असल्याची कबुली दिली होती. त्यापैकी आरिफचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 
आरिफच्या मृत्यूची बातमी तन्कीकडून समजल्यचे फहाद शेखचे काका इफ्तिकार खान यांनी सांगितले. ' तन्कीने मंगळवारी कुटुंबियांना फोन करून आरिफचा इराकमध्ये मृत्यू झाल्याची बातमी दिली. आपण आरिफच्या ख्यालीखुशीलीची चौकशी  केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे समजले' असे तन्कीने फोनवरून सांगितले. मात्र याप्रकरणी आपल्याला जास्त माहिती मिळ शकली नसल्याचेही तो म्हणाला. आरिफच्या मृत्यूबाबात गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही',  असेही इफ्तिकार खान यांनी सांगितले
कल्याणमध्ये हे चारही तरूण आपापल्या कुटुंबियांसोबत रहात होते. दहशतवादविरोदी पथकाच्या अधिका-यांनी १४ जुलै रोजी त्यांच्या घरून लॅपटॉप्स आणि पेनड्राईव्ह जप्त केले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी आरिफचे वडील, एजाज माजीद यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली होती. आपल्या मुलाला 'जिहाद'चा मार्ग स्वीकारायला लावणा-यांविरोधी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजीद यांनी केली होती. 
धार्मिक यात्रेसाठी ३० जणांच्या ग्रुपबरोबर इराकमध्ये गेलेले हे चौघेजण भारतात परत येण्याच्या एक दिवस आधी गायब झाले होते. चौघांना 'मौसुल' येथे सोडल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने शोधपथकातील अधिका-यांना दिली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. यात्रेला जाण्यापूर्वी आरिफ कुटुंबियांसाठी घरात एक पत्रही ठेवून गेला होता. त्यात त्याने धूम्रपान, टीव्ही पाहणे, अनैतिक शरीरसंबंध, चैनीने जीवन जगणे, प्रार्थना न करणे या सर्व कृत्यांचा पाप असा उल्लेख करत त्याबद्दल चीड व्यक्त केली होती. तसेच या सर्व पापांमुळे नरकातील आग वाट्याला येईल असा इशाराही त्याने कुटुंबियांना दिला होता.