शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कंपनी कायद्यातील दंडात्मक तरतुदी रद्द होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 04:58 IST

केंद्राचा प्रस्ताव : ४0 कलमांतून तुरुंगवासाची शिक्षा काढणार

नवी दिल्ली : कंपनी कायद्यातील दोन तृतियांश गुन्ह्यांतील दंडात्मक तरतुदी रद्द करण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. या कायद्यातील ६६ पैकी ४0 कलमांतील तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद काढून टाकली जाणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या सुधारणांसाठी आग्रह धरला आहे. छोट्या कंपन्यांसाठी असलेली दंडाची तरतूदही कमी करण्याची मागणी मंत्रालयाने केली आहे. देशात नोंदणीकृत असलेल्या ११ लाख कंपन्यांपैकी दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या आणि ५0 लाखांपर्यंत मूळ भागभांडवल (पेड-अप कॅपिटल) असलेल्या आठ लाख कंपन्यांना प्रस्तावित बदलांचा लाभ होईल. तडजोड प्रक्रियेद्वारे कंपनी अथवा तिचे संचालक दंड भरून खटला टाळू शकतील.

कॉर्पोरेट व्यवहार सचिव इंजेटी श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखालील कंपनी कायदा समितीमध्ये या उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तुरुंगवासाऐवजी कठोर प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यावर समिती विचार करीत आहे. उदा. एखाद्या कंपनीने नियम मोडल्यास कंपनीला निधीपासून दूर ठेवता येऊ शकेल. अथवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे स्थलांतर रोखता येईल.या समितीवर कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आणि विधिज्ञ शार्दूल श्रॉफ हे सदस्य आहेत. काही आठवड्यांतच समिती अहवालास अंतिम स्वरूप देईल. पुढील महिन्यात होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल करणारे विधेयक आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.गंभीर गुन्ह्यांतच कैदसूत्रांनी सांगितले की, संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा सन्मान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, त्यानुसार कंपनी कायद्यात योग्य बदल केले जात आहेत. तडजोडीला परवानगी नसलेल्या कलमांना आम्ही हात लावणार नाही. तुरुंगवासाची तरतूद मात्र केवळ गंभीर गुन्ह्यांतच असेल.