शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नगर परिषदेच्या घनकचऱ्यातून वीजनिर्मितीची शक्यता

By admin | Updated: December 19, 2014 04:26 IST

महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत.

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत. पुणे नगर परिषदेने प्रत्येकी पाच टन क्षमतेचे १८ बायोगॅस प्रकल्प उभारलेले आहेत. त्यामध्ये उत्पादित विजेचा पुरवठा रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्यासाठीही करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.महाराष्ट्राच्या अलिबाग (जि. रायगड), चिपळूण (खेड), दापोली (रत्नागिरी), कळमेश्वर (नागपूर) या नगर परिषदा बायो मेथॉनेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घनकचऱ्यापासून वीज उत्पादन घेत आहेत, असे नायडू यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने ३० वर्षांसाठी डीओबीटीच्या आधारावर तापद्वारा वायूकरण संबंधी तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प स्थापन केलेला आहे, असे नायडू म्हणाले.‘कचऱ्यापासून ऊर्जा’ वर २०१४मध्ये प्रकाशित झालेल्या योजना आयोगाच्या कृती दलाच्या अहवालाचा संदर्भ देताना नायडू म्हणाले, भारतात प्रतिदिन निघणारा ३२८९० टन कचरा रिफ्युज्ड डिराईव्ह फ्युएल (कचऱ्यापासून निर्माण होणारी वीज) निर्माण करू शकतो. हे इंधन सध्या भस्मीकरण, वायुकरण किंवा ताप तंत्रज्ञानावर आधारित पुढच्या पाच-सात वर्षांप्मध्ये पाच मेगावॅट क्षमतेचे ८८ विद्युत प्रकल्प चालविण्यास सहायक ठरू शकतात. २०३१ पर्यंत याप्रकारच्या कचऱ्यापासून चालणाऱ्या वीज प्रकल्पांची संख्या २१५ आणि सन २०५० पर्यंत २७८० मेगावॅट वीज निर्मिती करणाऱ्या ५५६ वीज प्रकल्पांपर्यंत पोहोचू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली़देशात नगरपालिकेच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादनाच्या शक्यता आहेत का? तसेच महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी नगर परिषदांच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादन करण्याच्या दिशेने सरकारने काय पावले उचलली, असे प्रश्न खा़ दर्डा यांनी विचारले होते़