शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नगर परिषदेच्या घनकचऱ्यातून वीजनिर्मितीची शक्यता

By admin | Updated: December 19, 2014 04:26 IST

महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत.

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत. पुणे नगर परिषदेने प्रत्येकी पाच टन क्षमतेचे १८ बायोगॅस प्रकल्प उभारलेले आहेत. त्यामध्ये उत्पादित विजेचा पुरवठा रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्यासाठीही करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.महाराष्ट्राच्या अलिबाग (जि. रायगड), चिपळूण (खेड), दापोली (रत्नागिरी), कळमेश्वर (नागपूर) या नगर परिषदा बायो मेथॉनेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घनकचऱ्यापासून वीज उत्पादन घेत आहेत, असे नायडू यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने ३० वर्षांसाठी डीओबीटीच्या आधारावर तापद्वारा वायूकरण संबंधी तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प स्थापन केलेला आहे, असे नायडू म्हणाले.‘कचऱ्यापासून ऊर्जा’ वर २०१४मध्ये प्रकाशित झालेल्या योजना आयोगाच्या कृती दलाच्या अहवालाचा संदर्भ देताना नायडू म्हणाले, भारतात प्रतिदिन निघणारा ३२८९० टन कचरा रिफ्युज्ड डिराईव्ह फ्युएल (कचऱ्यापासून निर्माण होणारी वीज) निर्माण करू शकतो. हे इंधन सध्या भस्मीकरण, वायुकरण किंवा ताप तंत्रज्ञानावर आधारित पुढच्या पाच-सात वर्षांप्मध्ये पाच मेगावॅट क्षमतेचे ८८ विद्युत प्रकल्प चालविण्यास सहायक ठरू शकतात. २०३१ पर्यंत याप्रकारच्या कचऱ्यापासून चालणाऱ्या वीज प्रकल्पांची संख्या २१५ आणि सन २०५० पर्यंत २७८० मेगावॅट वीज निर्मिती करणाऱ्या ५५६ वीज प्रकल्पांपर्यंत पोहोचू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली़देशात नगरपालिकेच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादनाच्या शक्यता आहेत का? तसेच महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी नगर परिषदांच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादन करण्याच्या दिशेने सरकारने काय पावले उचलली, असे प्रश्न खा़ दर्डा यांनी विचारले होते़