शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

संसदेतील कोंडी कायम राहण्याची शक्यता

By admin | Updated: July 31, 2015 01:44 IST

संसदेतील कोंडी आज शुक्रवारी आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

- जयशंकर गुप्त, नवी दिल्लीसंसदेतील कोंडी आज शुक्रवारी आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या २१ जुलैपासून संसदेचे कामकाज ठप्प पाडलेले आहे. संसदेतील कामकाज सुरळीत चालावे म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती; पण कोंडी न फुटल्याने ही बैठक निष्फळ ठरली.संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच कोंडी निर्माण झाल्याची कारणे दूर करून कामकाज सुरळीत करण्याचे सुनिश्चित केले पाहिजे, असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्वराज, राजे आणि चौहान यांनी राजीनामा देईपर्यंत संसदेचे कामकाज ठप्प पाडण्याच्या आपल्या भूमिकेवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष कायम आहेत, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, गुरुवारी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर लोकसभेत कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे संकेतसुषमा स्वराज यांच्यासह भाजप नेत्यांच्या राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आपली तयारी असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.