शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

गरीब फासावर, धनाढ्य निर्धास्त

By admin | Updated: July 21, 2015 11:22 IST

कायद्यासमोर श्रीमंत व गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही असे नेहमीच सांगितले जाते. पण गेल्या १५ वर्षात फाशी झालेल्यांची आकडेवारी बघितली तर भीषण वास्तव समोर येते.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - कायद्यासमोर श्रीमंत  व गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही असे नेहमीच सांगितले जाते. पण गेल्या १५ वर्षात मृत्यूदंड  आकडेवारी बघितली तर भीषण वास्तव समोर येते. यात श्रीमंताच्या तुलनेत गरीबांना जास्त कठोर शिक्षा दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या १५ वर्षात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या ३७३ गुन्हेगारांचा सखोल अभ्यास केला. यातील तीन चतुर्थांश गुन्हेगार हे मागासवर्गीय व अल्पसंख्यांक वर्गातील होते. तर ७५ टक्के गुन्हेगार ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. गरीब व मागासवर्गीय लोकांना कठोर शिक्षा होण्याची कारणं शोधली असता या गुन्हेगारांना स्वतःचा बचाव करण्यासाठी वकिलाची नेमणूकही करता येत नाही, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना वकिल करणे कठीण होते. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील बहुसंख्य गुन्हेगार हे सुनावणीसाठी कोर्टातही हजर राहत नाही. हजर राहिलो तरी न्यायालयात काय सुरु आहे हेच समजत नाही असे या गुन्हेगारांचे म्हणणे आहे. न्यायव्यवस्थेतील या परिस्थितीवर ख्यातनाम कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण म्हणाले, अजूनही बरेच कैदी असे असतात ज्यांची साधा जामीन मिऴवण्यासाठी वकिल करण्याची कुवत नाही. न्यायव्यवस्थेत श्रीमंतांपेक्षा गरींबांना जास्त कठोर शिक्षा होते या दाव्यात तथ्य आहे. लॉ कमिशन आता मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवावी की नाही यावर विचारमिनीमय करत आहे. या समितीचे अध्यक्ष न्या. ए.पी शाह हे मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात असून ही समिती पुढील महिन्यात सुप्रीम कोर्टासमोर अहवाल सादर करणार आहे.