शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पोल - मोदी सरकारच्या कामगिरीवर ७० टक्के सहभागी समाधानी

By admin | Updated: May 27, 2016 08:52 IST

केंद्रातल्या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पोलमध्ये ७० टक्के सहभागी मोदी सरकारच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विरोधकांनी केला. मात्र  सरकारच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी 'ऑनलाइन लोकमत'ने नुकताच एक पोल घेतला. त्यामध्ये दोन वर्षातील मोदी सरकारची कामगिरी, बेरोजगारी घटली का? काळा पैसा परत आणण्यासंबधी मोदींनी दिलेले आश्वासन, जगात भारताची पत वाढली आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये हजारो वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली मत नोंदवली असून २२ टक्के सहभागींनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकार'ला १०० पैकी १०० गुण दिले असून ७० टक्के सहभागी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधानी आहेत.  तर सरकारच्या प्रयत्नांमुळे बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे ५१.१ टक्के सहभागींनी नमूद केले आहे असून सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली झाल्याचे मत ६४.३ टक्के लोकांनी नोंदवले.
 
'अच्छे दिन' पोलचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :
 
२२ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीला दिले पैकीच्या पैकी गुण...
 
 
सरकारच्या प्रयत्नामुळे बेरोजगारी घटली असं ५१.१ टक्के लोकांना वाटतं...
 
 
 
मतदारसंघातले सत्ताधारी खासदार समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ४६.१ टक्के सहभागींनी सांगितले असले तरी ४२.३ टक्के लोकांनीना नकार दिला. 
 
 
काळा पैसा परत आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं नसल्याचं मत ४६.२ टक्के सहभागींनी नोंदवले आहे.
 
 
 
तर सरकारच्या प्रयत्नांमुळे व्यवसाय करणं पहिल्यापेक्षा तुलनेनं सोपं झाल्याचं ६३.५ टक्के सहभागींच म्हणणं आहे. 
 
तर ६९.१ टक्के लोकांनी रस्ते, सिंचन, दूरसंचार आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे. 
 
 
 
सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली असल्याचे मत ६४.३ टक्के सहभागींनी नोंदवले असले तरीही २४.९ टक्के सहभागींना तसं वाटत नाही. 
 
जगातल्या अन्य देशांमध्ये भारताची पत वाढल्याचे ८३.४ टक्के सहभागींनी मान्य केले आहे.
 
 
 
मोदी सरकार समाजातल्या सगळ्या घटकांना एकसमान वागणूक देत असल्याबद्दल लोकांच्या मनात दुमत नसून ६७.४ टक्के सहभागींनी त्यास होकार दर्शवला आहे. 
 
 
एकूणच जनता सरकारच्या कामगिरीवर खुश असून  निम्म्याहून अधिक म्हणजेच ७०.२ टक्के सहभागींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.