शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पोल - मोदी सरकारच्या कामगिरीवर ७० टक्के सहभागी समाधानी

By admin | Updated: May 27, 2016 08:52 IST

केंद्रातल्या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पोलमध्ये ७० टक्के सहभागी मोदी सरकारच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विरोधकांनी केला. मात्र  सरकारच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी 'ऑनलाइन लोकमत'ने नुकताच एक पोल घेतला. त्यामध्ये दोन वर्षातील मोदी सरकारची कामगिरी, बेरोजगारी घटली का? काळा पैसा परत आणण्यासंबधी मोदींनी दिलेले आश्वासन, जगात भारताची पत वाढली आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये हजारो वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली मत नोंदवली असून २२ टक्के सहभागींनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकार'ला १०० पैकी १०० गुण दिले असून ७० टक्के सहभागी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधानी आहेत.  तर सरकारच्या प्रयत्नांमुळे बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे ५१.१ टक्के सहभागींनी नमूद केले आहे असून सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली झाल्याचे मत ६४.३ टक्के लोकांनी नोंदवले.
 
'अच्छे दिन' पोलचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :
 
२२ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीला दिले पैकीच्या पैकी गुण...
 
 
सरकारच्या प्रयत्नामुळे बेरोजगारी घटली असं ५१.१ टक्के लोकांना वाटतं...
 
 
 
मतदारसंघातले सत्ताधारी खासदार समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ४६.१ टक्के सहभागींनी सांगितले असले तरी ४२.३ टक्के लोकांनीना नकार दिला. 
 
 
काळा पैसा परत आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं नसल्याचं मत ४६.२ टक्के सहभागींनी नोंदवले आहे.
 
 
 
तर सरकारच्या प्रयत्नांमुळे व्यवसाय करणं पहिल्यापेक्षा तुलनेनं सोपं झाल्याचं ६३.५ टक्के सहभागींच म्हणणं आहे. 
 
तर ६९.१ टक्के लोकांनी रस्ते, सिंचन, दूरसंचार आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे. 
 
 
 
सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली असल्याचे मत ६४.३ टक्के सहभागींनी नोंदवले असले तरीही २४.९ टक्के सहभागींना तसं वाटत नाही. 
 
जगातल्या अन्य देशांमध्ये भारताची पत वाढल्याचे ८३.४ टक्के सहभागींनी मान्य केले आहे.
 
 
 
मोदी सरकार समाजातल्या सगळ्या घटकांना एकसमान वागणूक देत असल्याबद्दल लोकांच्या मनात दुमत नसून ६७.४ टक्के सहभागींनी त्यास होकार दर्शवला आहे. 
 
 
एकूणच जनता सरकारच्या कामगिरीवर खुश असून  निम्म्याहून अधिक म्हणजेच ७०.२ टक्के सहभागींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.