शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पोल - मोदी सरकारच्या कामगिरीवर ७० टक्के सहभागी समाधानी

By admin | Updated: May 27, 2016 08:52 IST

केंद्रातल्या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पोलमध्ये ७० टक्के सहभागी मोदी सरकारच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विरोधकांनी केला. मात्र  सरकारच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी 'ऑनलाइन लोकमत'ने नुकताच एक पोल घेतला. त्यामध्ये दोन वर्षातील मोदी सरकारची कामगिरी, बेरोजगारी घटली का? काळा पैसा परत आणण्यासंबधी मोदींनी दिलेले आश्वासन, जगात भारताची पत वाढली आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये हजारो वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली मत नोंदवली असून २२ टक्के सहभागींनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकार'ला १०० पैकी १०० गुण दिले असून ७० टक्के सहभागी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधानी आहेत.  तर सरकारच्या प्रयत्नांमुळे बेरोजगारीचे प्रमाण घटल्याचे ५१.१ टक्के सहभागींनी नमूद केले आहे असून सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली झाल्याचे मत ६४.३ टक्के लोकांनी नोंदवले.
 
'अच्छे दिन' पोलचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :
 
२२ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीला दिले पैकीच्या पैकी गुण...
 
 
सरकारच्या प्रयत्नामुळे बेरोजगारी घटली असं ५१.१ टक्के लोकांना वाटतं...
 
 
 
मतदारसंघातले सत्ताधारी खासदार समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ४६.१ टक्के सहभागींनी सांगितले असले तरी ४२.३ टक्के लोकांनीना नकार दिला. 
 
 
काळा पैसा परत आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं नसल्याचं मत ४६.२ टक्के सहभागींनी नोंदवले आहे.
 
 
 
तर सरकारच्या प्रयत्नांमुळे व्यवसाय करणं पहिल्यापेक्षा तुलनेनं सोपं झाल्याचं ६३.५ टक्के सहभागींच म्हणणं आहे. 
 
तर ६९.१ टक्के लोकांनी रस्ते, सिंचन, दूरसंचार आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे. 
 
 
 
सर्वसाधारण जीवनमान उंचावण्यात सरकारची कामगिरी चांगली असल्याचे मत ६४.३ टक्के सहभागींनी नोंदवले असले तरीही २४.९ टक्के सहभागींना तसं वाटत नाही. 
 
जगातल्या अन्य देशांमध्ये भारताची पत वाढल्याचे ८३.४ टक्के सहभागींनी मान्य केले आहे.
 
 
 
मोदी सरकार समाजातल्या सगळ्या घटकांना एकसमान वागणूक देत असल्याबद्दल लोकांच्या मनात दुमत नसून ६७.४ टक्के सहभागींनी त्यास होकार दर्शवला आहे. 
 
 
एकूणच जनता सरकारच्या कामगिरीवर खुश असून  निम्म्याहून अधिक म्हणजेच ७०.२ टक्के सहभागींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे.