शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

राजकीय पक्षांना आरटीआय नको

By admin | Updated: August 25, 2015 04:00 IST

राजकीय पक्षांना माहितीचा अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणता येणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी मांडली. राजकीय पक्षांना

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना माहितीचा अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणता येणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी मांडली. राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानून या कायद्यांतर्गत आणल्यास त्यांच्या सुरळीत चालणाऱ्या कार्यावर विपरीत परिणाम होईल. राजकीय पक्षांना वाईट हेतूने माहिती मागण्यासाठी याचिका दाखल करण्याची संधीच मिळेल, असा युक्तिवादही सरकारने केला.आरटीआय कायदा लागू करण्यात आला तेव्हा राजकीय पक्षांना पारदर्शकता कायद्यांतर्गत आणण्याचा दृष्टिकोन नव्हता. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ आणि आयकर कायद्यानुसार राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहाराबाबत पारदर्शकता आणली गेली आहे, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानून आरटीआयअंतर्गत आणले जावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राला नोटीस पाठविली होती. उत्तरादाखल सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करताना प्रतिकूल परिणामांकडे लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुक्त व्याख्येमुळे चुकीचा निष्कर्षकेंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) आरटीआय कायद्याच्या कलम २(एच)ची अतिशय मुक्त व्याख्या केल्यामुळे राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानण्याचा चुकीचा निष्कर्ष काढण्यात आला. आरटीआय कायदा लागू करताना राजकीय पक्षांना त्याच्या कक्षेत आणण्याचा दृष्टिकोन नव्हता. राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानले गेले तर त्यांच्या अंतर्गत कामकाजावर विपरीत परिणाम होईल, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.